
-
प्रतिनिधी
राज्यात पावसाचा जोर वाढत असून भारतीय हवामान विभागाने मुंबई, रायगड, रत्नागिरीसह पुणे व सातारा घाटमाथ्यावर पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे कोकण व पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थितीचे संकेत मिळत असून, खबरदारीचा उपाय म्हणून रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना गुरुवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (Monsoon Updates)
(हेही वाचा – Crime News : पत्नीला बॉयफ्रेंडसह पाहिल्यानंतर चिडलेल्या पतीने पत्नीला केलं शूर्पणखा !)
मुंबई शहरात १४२.६ मिमी पावसाची नोंद
राज्यात १८ जून सकाळपासून १९ जून सकाळपर्यंत झालेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार :
- मुंबई शहर जिल्हा – १४२.६ मिमी
- रायगड – १३४.१ मिमी
- पालघर – १२०.९ मिमी
- ठाणे – ९०.३ मिमी
- रत्नागिरी – ६०.९ मिमी
या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
झाड पडले, दरड कोसळली, पाळणा कोसळून मृत्यू
- मुंबई उपनगरात झाड पडून एक व्यक्ती जखमी.
- सोलापूर जिल्ह्यात विजेच्या पाळण्याचा अपघात; एकाचा मृत्यू, दोन जखमी.
- सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये हातेरी नदीवरील रस्ता वाहून गेला.
- रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यात कुचंबे गावात दरड कोसळली; नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले. (Monsoon Updates)
नद्या इशारा आणि धोका पातळीवर
- रायगड जिल्ह्यातील अंबा आणि कुंडलिका नद्या – धोका पातळी पार.
- पाताळगंगा आणि जगबुडी नद्या – इशारा पातळी पार.
जिल्हानिहाय पावसाची स्थिती (मिमी मध्ये)
- सातारा – १७.७
- नाशिक – ४०.३
- पुणे – २९.३
- कोल्हापूर – १२.१
- सांगली – ५.९
- नांदेड, बीड, धाराशिव – १ मिमी पेक्षा कमी
- विदर्भात तुरळक पाऊस – चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यात <५ मिमी (Monsoon Updates)
(हेही वाचा – Israel Iran Conflict : इराणचा इस्रायलच्या रुग्णालयावर मिसाईल हल्ला; एका भारतीयाचा मृत्यू)
सावधानतेचे आवाहन
राज्य आपत्कालीन केंद्राकडून नागरिकांना नद्या, ओढे आणि दरडप्रवण भागांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनांना तातडीची कार्यवाही आणि मदत पथकांना सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असून, पुढील काही दिवस प्रशासनासाठी कसोटीचे असणार आहेत. नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. (Monsoon Updates)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community