Monsoon Update : शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, पाऊस पुन्हा दडी मारणार ? कृषी विभागाचं आवाहन काय ?

Monsoon Update : शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, पाऊस पुन्हा दडी मारणार ? कृषी विभागाचं आवाहन काय ?

109
Monsoon Update : शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, पाऊस पुन्हा दडी मारणार ? कृषी विभागाचं आवाहन काय ?
Monsoon Update : शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, पाऊस पुन्हा दडी मारणार ? कृषी विभागाचं आवाहन काय ?

मान्सून (Monsoon Update) यंदा १२ दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मे महिन्यातच राज्यात मान्सून येण्याची ही १६ वर्षांतील पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढील २४ तासांमध्ये मान्सून रविवारी चक्क तळकोकणात पोहोचला आहे. कर्नाटक आणि संपूर्ण गोवा राज्यातही त्याने धडक दिली. पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून संपूर्ण मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (Monsoon Update)

हेही वाचा-Pune Rain : पुणे जिल्ह्यात तुफान पाऊस ! कालवा फुटला, नद्यांना पूर आला, घराघरांत पाणी शिरलं ; Ajit Pawar यांनी केली पाहणी

मान्सूनच्या प्रवासाची गती लवकरच कमी होणार असल्यामुळे राज्यात पावसात घट होणार आहे. या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरु असल्यामुळे तो 25 मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे, जे सामान्य तारखेपेक्षा 10 दिवस आधीच आहे. मात्र 27 मे पासून मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील. (Monsoon Update)

हेही वाचा- Nariman Point to palghar : मुंबईत होतेय आणखी एक सी-लिंक ! मरीन ड्राईव्ह ते पालघर प्रवास फक्त सव्वा तासात

सध्याच्या अंदाजानुसार 27 मे पासून राज्यातील हवामान हळू हळू कोरडे होईल आणि काही प्रमाणात तापमानात वाढ देखील होईल. मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे, आणि किमान 5 जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. (Monsoon Update)

हेही वाचा- कोथरूडसह पुण्यात कुठेही पाणी साचू नये याची दक्षता घ्या; Chandrakant Patil यांची सूचना

यामुळे किमान 5 जूनपर्यंत तरी राज्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल होण्याची आणि मान्सूनच्या पावसाची शक्यता दिसत नाही. या दरम्यान देशातील इतर भागात सुद्धा मान्सूनचा प्रवास तात्पुरता थांबू शकतो. या वर्षी राज्यातील अनेक भागात दमदार मान्सून पूर्वीचा वादळी पाऊस पडला आहे. आपल्या भागात मान्सून लवकरच दाखल होईल अशी अपेक्षा करून अथवा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये. हवामान कोरडे होणार असल्यामुळे जर पेरणीची घाई केली तर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. (Monsoon Update)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.