जेएनपीटी बंदर ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान नियमितपणे चालणाऱ्या जलसेवेत पावसाळ्यामुळे बदल करण्यात आला आहे. १ जूनपासून ३० सप्टेंबरपर्यंत ही जलसेवा आता गेट वे ऑफ इंडिया ऐवजी भाऊचा धक्का (फेरी वॉर्फ) पर्यंतच सेवा असणार आहे. (JNPA)
(हेही वाचा – Monsoon Session : २१ जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार; ‘ऑपरेशन सिंदूर’चा मुद्दा संसदेत गाजणार?)
पावसाळ्यात समुद्रात वाढणारी लाटांची तीव्रता, खवळलेला समुद्र आणि सुरक्षिततेचा विचार करता हा बदल करण्यात आला आहे. ही जलसेवा मुख्यत्वे जेएनपीटीमधील कर्मचारी, त्यांच्या कुटुंबीयांसाठी तसेच बंदरावर आधारित पाच खासगी बंदरांतील नागरिकांसाठी आहे. जेएनपीए (JNPA) वाहतूक विभागाचे कॅप्टन बाळासाहेब पवार यांनी सांगितले की, पावसाळ्यातील चार महिन्यांसाठी जलसेवेचा मार्ग बदलण्यात आला आहे. मात्र हवामान अनुकूल असल्यास सेवा पूर्वीप्रमाणे गेट वेपर्यंत सुरू ठेवण्याचा विचारही केला जाईल.
(हेही वाचा – IPL 2025, RCB Champions : बंगळुरूच्या विजयानंतर कोहलीने रवी शास्त्रीला जोरदार मिठी का मारली?)
मोरा-मुंबई जलसेवेप्रमाणेच जेएनपीए (JNPA) जलसेवा देखील पावसाळ्यात बंद न होता सुरू ठेवण्यात येणार आहे. मात्र हवामानात अनपेक्षित बदल झाल्यास सेवेत तात्पुरते बदल केले आहेत, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या बदलामुळे जेएनपीटी परिसरातील कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना मुंबईशी जोडणारा जलमार्ग पावसाळ्यातही उपलब्ध राहणार असून, ही सेवा सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community