Mizoram Railway Connectivity : देशातील आणखी एका राज्यात पोहोचली रेल्वे; अभियांत्रिकीचे उत्कृष्ट उदाहरण

56

पंतप्रधानांच्या ‘कनेक्ट नॉर्थ ईस्ट’ मिशन अंतर्गत मिझोराम राज्याला भारतीय रेल्वेशी जोडण्यात आले आहे. बुधवार, ११ जून या दिवशी यशस्वीरित्या याचा स्पीड ट्रायल (Speed Trial) झाला. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती दिली. (Mizoram Railway Connectivity)

पंतप्रधानांच्या ‘कनेक्ट नॉर्थ ईस्ट’ मिशन अंतर्गत, ईशान्येकडील (North East) आणखी एक राज्य भारतीय रेल्वेशी जोडले गेले आहे. मिझोरामची राजधानी ऐझॉल (Aizawl) पर्यंत रेल्वेची सुविधा पोहोचवण्यासाठी रेल्वे मार्गिका (rail track) टाकण्यात आली आहे. बुधवारी (११ जून २०२५) त्याचा स्पीड ट्रायल झाला. एका मालगाडीला नव्या ट्रॅकवरून नेण्यात आले आणि हा एक यशस्वी स्पीड ट्रायल होता.

(हेही वाचा – आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार ; Pratap Sarnaik यांची माहिती)

या यशस्वी ट्रायल नंतर लोकांना आशा आहे की, आता या ट्रॅकवर प्रवासी गाड्या (passenger trains) धावण्याचा दिवस दूर नाही. लोकांना वाटते की, प्रवासी गाड्यांबाबतच्या सर्व औपचारिकता (formalities) सरकारकडून लवकरच पूर्ण केल्या जातील.

ऐझॉल ते दिल्ली प्रवास झाला सोपा

ऐझॉल हे ईशान्येकडील चौथे राज्य असेल जे रेल्वे कनेक्टिव्हिटीने पूर्णपणे जोडले जाईल. यामुळे आता दिल्लीहून ऐझॉलला जाणाऱ्या लोकांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही.

अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करून दिली माहिती

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करून ही माहिती दिली. त्यांनी लिहिले, ‘मिझोरामची राजधानी (ऐझॉल) भारताच्या प्रत्येक हृदयाशी जोडत आहे! लुमडिंग डिव्हिजन – एन.एफ. रेल्वेच्या बैराबी-सैरांग नवीन बी.जी. लाईन प्रकल्पाचा सी.आर.एस. स्पीड ट्रायल.’

अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना आहे हा प्रकल्प

या योजनेचे चार खंड आहेत: भैरवी ते होरटोकी (१६.७२ किलोमीटर), होरटोकी ते कावनपुई (९.७१ किलोमीटर), कावनपुई ते मुआलखांग (१२.११ किलोमीटर) आणि मुआलखांग ते सैरांग (१२.८४ किलोमीटर). या प्रकल्पाची एकूण लांबी ५१.३८ किलोमीटर आहे. त्याची अंदाजित किंमत ५०२१.४५ कोटी रुपये आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे ९७ टक्के काम पूर्ण झाले आहे. हे अभियांत्रिकीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. या संपूर्ण प्रकल्पात ४८ बोगदे (tunnels), ५५ मोठे पूल (major bridges), ८७ छोटे पूल (small bridges), ५ रोड ओव्हर ब्रिज (ROBs), ६ रोड अंडर ब्रिज (RUBs) आहेत. याच ट्रॅकवरील पूल क्रमांक १९६ ची उंची १०४ मीटर (कुतुब मीनारपेक्षा ४२ मीटर जास्त) आहे.

याचे सामरिक महत्त्व काय आहे?

या भागातून दोन आंतरराष्ट्रीय सीमा लागून आहेत, ज्यात एक म्यानमार (बर्मा) आणि दुसरा बांगलादेश आहे. हा ट्रॅक पूर्ण झाल्याने सामरिक दृष्टीने (strategic perspective) एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाणे सोपे होईल. (Mizoram Railway Connectivity)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.