पावसाळ्यापूर्वी रेल्वे ट्रॅकवर उतरले मंत्री Ashish Shelar; म्हणाले, ब्लेम गेम थांबवा, समन्वयाने काम करा!

100
पावसाळ्यापूर्वी रेल्वे ट्रॅकवर उतरले मंत्री Ashish Shelar; म्हणाले, ब्लेम गेम थांबवा, समन्वयाने काम करा!
  • प्रतिनिधी

पावसाळ्यात मुंबईकरांची जीवघेणी गैरसोय होऊ नये म्हणून, राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री ऍड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शनिवारी प्रत्यक्ष रेल्वे ट्रॅकमध्ये उतरून कामांची पाहणी केली. तसेच, “ब्लेम गेम थांबवा आणि समन्वय साधून काम करा,” अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी रेल्वे, महापालिका, पोलीस व अन्य संबंधित विभागांना आदेश दिले.

मस्जिद, सँडहस रोड ते भायखळा दरम्यान त्यांनी ट्रॅकमध्ये उतरून नालेसफाईसह विविध कामांची पाहणी केली. त्यानंतर सायन, कुर्ला, विक्रोळी, भांडूप आणि कांजूरमार्ग रेल्वे स्थानकांवर बसवलेले पंप आणि परिसरातील तयारीचीही त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

(हेही वाचा – Operation Sindoor वर टीका करणारी पोस्ट टाकणाऱ्या खादिजा शेखला जामीन मंजूर)

“२४ धोकादायक इमारतींचा अहवाल मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्र्यांना देणार”

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भांडूप दरम्यान उपनगरीय लोकलने प्रवास केल्यानंतर आयोजित बैठकीत, मुंबई महापालिकेने मस्जिद आणि सँडहस रोडदरम्यान २४ इमारती धोकादायक घोषित केल्याची माहिती देण्यात आली. यावर प्रतिक्रिया देताना शेलार (Ashish Shelar) म्हणाले, “मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्र्यांना या इमारतींचा तपशील कळवून निर्णय घेण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन.”

“८१२ पैकी ७५० कल्व्हर्ट स्वच्छ, उरलेले तातडीने साफ करा”

मध्य रेल्वे क्षेत्रात एकूण ८१२ कल्व्हर्ट असून त्यापैकी ७५० ची सफाई पूर्ण झाली आहे, अशी माहिती दिली जाताच, शेलार (Ashish Shelar) यांनी “उरलेले कल्व्हर्ट तातडीने स्वच्छ करा” असे आदेश दिले. त्याचबरोबर, ६३७ धोकादायक झाडांपैकी ५५० झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्याची माहिती देताना, “बाकी झाडांचे काम तात्काळ पूर्ण करा,” अशीही त्यांनी सूचना केली.

(हेही वाचा – Dagdusheth Ganpati : दगडूशेठ यंदा तिरुअनंतपुरम येथील श्री पद्मनाभस्वामी मंदिराची प्रतिकृती साकारणार !)

“१७७ पंप्स लावा आणि वेळेत टेस्टींग करा”

गेल्या वर्षी ९६ ठिकाणी लावण्यात आलेल्या पंप्सची संख्या यंदा वाढवून १७७ केली आहे. “या सर्व पंप्सचे टेस्टींग पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाले पाहिजे,” असे स्पष्ट निर्देश शेलार (Ashish Shelar) यांनी दिले.

“पुरमोजमाप यंत्रणांचा बीएमसीशी समन्वय अनिवार्य”

रेल्वे प्रशासनाने ३६ ठिकाणी पुरमोजमाप यंत्रणा बसवल्या असून त्यातील ५ ऑटोमॅटिक व १२ मॅन्युअल आहेत. परंतु या मोजमापांची माहिती महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाशी जोडली गेली नाही तर प्रत्यक्ष निचऱ्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, “दोन्ही विभागांनी समन्वय साधावा,” असे शेलार (Ashish Shelar) यांनी स्पष्टपणे सांगितले.

(हेही वाचा – Sanskrit for Coding : आता कोडिंगसाठी संस्कृत भाषेचा वापर होणार ; दिल्ली विद्यापीठाचा मोठा निर्णय)

“पावसाळी गर्दीसाठी डिझास्टर प्लॅन तयार ठेवा”

रेल्वे स्थानकांवरील गर्दी आणि ट्रेन उशिरामुळे होणाऱ्या संभाव्य गोंधळावरही त्यांनी लक्ष केंद्रित केले. “स्थानिक रेल्वे पोलीस आणि बीएमसी आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी एक संयुक्त डिझास्टर प्लॅन तयार करावा, ज्या अंतर्गत बीएसटीच्या बसेसचा पर्याय वापरता येईल,” असे निर्देश त्यांनी दिले.

“कोणतेही आरोप – प्रत्यारोप नकोत, सर्व विभागांनी एकसंघ काम करा”

बैठकीच्या शेवटी शेलार (Ashish Shelar) यांनी सर्व संबंधित विभाग – पश्चिम व मध्य रेल्वे, महापालिका, पोलीस, एसआरए, म्हाडा व आपत्ती व्यवस्थापन – यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “यापुढे कोणतेही आरोप – प्रत्यारोप खपवून घेतले जाणार नाहीत. सर्वांनी एकमेकांशी समन्वय साधून कामे पूर्ण करा.”

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.