Maharashtra Rain : राज्यात मुसळधार पावसाचे 21 बळी, 22 प्राणी दगावले ; आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे माहिती जाहीर

Maharashtra Rain : राज्यात मुसळधार पावसाचे 21 बळी, 22 प्राणी दगावले ; आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे माहिती जाहीर

73
Maharashtra Rain : राज्यात मुसळधार पावसाचे 21 बळी, 22 प्राणी दगावले ; आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे माहिती जाहीर
Maharashtra Rain : राज्यात मुसळधार पावसाचे 21 बळी, 22 प्राणी दगावले ; आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे माहिती जाहीर

राज्यात गेल्या चार दिवसांपासून अनेक ठिकाणी सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे (Maharashtra Rain) आतापर्यंत २१ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे जाहीर करण्यात आले आहे. तर १२ जण जखमी झाले असून, २२ प्राणी दगावल्याची माहिती देण्यात आली आहे. यात सर्वाधिक मृत्यूची नोंद ही पुणे आणि नांदेड जिल्ह्यात करण्यात आली असून, दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी तिघांनी जीव गमावला आहे. (Maharashtra Rain)

२२ गायी-म्हशी दगावल्या असून २ जखमी
राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने २४ मे ते २७ मे दरम्यान झालेल्या अतिवृष्टीबाबतचा सविस्तर अहवाल बुधवारी प्रसिद्ध केला. या अहवालानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ मे रोजी, तर मुंबईत २६ मे रोजी मान्सून दाखल झाला आहे. २४ ते २७ मे दरम्यान राज्याच्या विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. राज्यभरात पाण्यात बुडून, वीज पडून, भिंत कोसळून, झाड पडून अशा विविध कारणांनी २१ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, १२ लोक जखमी आहेत. याशिवाय, २२ गायी-म्हशी दगावल्या असून २ जखमी आहेत. (Maharashtra Rain)

कोकणात सर्वाधिक पावसाची नोंद
या अहवालानुसार राज्यात गेल्या चार दिवसांत एकूण सरासरी १७४.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. कोकणात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार दिवसांत ५११.६ मिमी तर रत्नागिरी येथे ५०२.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजेच ४१.४ मिमी पावसाची नोंद केली आहे. (Maharashtra Rain)

विदर्भ नदीच्या पुरात दोन जण वाहून गेले
पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात दमदार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. मंगळवारी सायंकाळपासून पाऊस सुरू आहे. पूर्णा आणि विदर्भ नदीच्या पुरात यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यातील दोन जण वाहून गेले. त्यांचा मृत्यू झाला. उत्तर महाराष्ट्रात नाशिक , जळगाव, धुळे, नंदुरबारमध्येही मान्सूनने जोरदार हजेरी लावली , तर गेल्या काही दिवसांपासून हजेरी लावलेल्या पावसाने पुण्यात विश्रांती घेतली. (Maharashtra Rain)

पावसाचा ऑरेंज अलर्ट
गुरुवारी विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. अमरावती, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. (Maharashtra Rain)

पिकांचे नुकसान
मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पाऊस आणि जोरदार वादळामुळे वाशीम जिल्ह्यात शेतीचे नुकसान झाले आहे. मंगरुळपीर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. या पावसामुळे फणसवाडी येथील शेतकऱ्याचे मका व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. (Maharashtra Rain)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.