जिहाद्यांनी २२ एप्रिल २०२५ या दिवशी दहशतवाद्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये हिंदूंना लक्ष्य केले. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांना गोळ्या घालण्यात आल्या, त्यांनी स्वतः कॅमेऱ्यासमोर सांगितले की, दहशतवाद्यांनी त्यांचा धर्म विचारून, त्यांना कलमा पढता येतो कि नाही, ते पाहून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. हा निर्घृण प्रकाराने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. या हत्यांमुळे ९० च्या दशकात काश्मिरी हिंदूंचे (Kashmiri Hindus) शिरकाण झाले, याच्या खपल्या उघड्या झाल्या आहेत.
३५ वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये असाच नरसंहार (Massacre in Kashmir) झाला होता. फरक एवढाच आहे की, आज काश्मीरला भेट देण्यासाठी गेलेल्या हिंदूंना लक्ष्य केले जात आहे आणि त्या वेळी स्थानिक हिंदूंना निवडकपणे मारले जात आहे. हिंदूंच्या वंशविच्छेदाचा हा इतिहास प्रत्येक राष्ट्रप्रेमीला माहिती हवाच. हिंदूंच्या नरसंहाराची सुरुवात वर्ष १९८९ मध्ये झाली. त्या वेळी काश्मीर खोऱ्यातील (Kashmir Valley) पंडितांच्या घराघरांवर फतवा चिकटवण्यात आला होता. ‘तुमच्या बायका आणि मुली इथेच ठेवून परागंदा व्हा’, असा संदेश त्यावर लिहिण्यात आला होता. मशिदींच्या भोंग्यांवरही हे फतवे सतत सांगण्यात येत होते. त्या वेळी आपल्या लेकी-बाळींचे शील वाचवण्यासाठी कित्येक काश्मिरी हिंदूंनी रातोरात नेसत्या वस्त्रानिशी घरे सोडली. ज्या हिंदूंनी त्यांचे ते प्रशस्त परंपरागत वाडे, सफरचंदाच्या बहरलेल्या बागा यांच्याकडे पाहून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, त्यांना पुढे जीवाचे मोल चुकवावे लागले. (Kashmiri Hindu Exodus)
इथे ओशाळला मृत्यू
या हत्याही इतक्या निर्घृण होत्या की, मानवतेला तो एक कायमचा कलंक लागला आहे. खोऱ्यातील काश्मिरी पंडितांचे सर्वांत मोठे आणि लोकप्रिय नेते टीका लाल टपलू होते. १४ सप्टेंबर १९८९ रोजी एका लहान मुलीला शांत करण्यासाठी ते घराबाहेर पडले, तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या घालून ठार मारले. या हल्ल्यात त्यांचे कुटुंब वाचले; कारण ते घटनेच्या एक आठवडा आधी दिल्लीला गेले होते. ४ नोव्हेंबर १९८९ या दिवशी उच्च न्यायालयासमोर न्यायमूर्ती नीलकंठ गंजू यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. त्यांचा गुन्हा असा होता की, त्यांनी एका हत्येच्या बदल्यात दहशतवादी मकबूल भट्टला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. याचा बदला घेण्यासाठी न्यायमूर्ती नीलकंठ यांची हत्या करण्यात आली. गिरिजा टिकू या शिक्षिका काश्मीर खोऱ्यातील शाळेत काम करत होत्या. त्या भीतीमुळे जम्मूमध्ये रहात होत्या. एके दिवशी त्यांना कळले की, परिस्थिती सामान्य झाली आहे; म्हणून त्या पगार घेण्यासाठी बांदीपोराला परत गेल्या. दहशतवाद्यांनी त्यांना तिथेच पकडले. त्यांच्यावर बलात्कार केला आणि नंतर ती जिवंत असताना करवतीने तिचे शरीर दोन तुकडे केले.
२२ मार्च १९९० या दिवशी अनंतनाग जिल्ह्यातील दुकानदार पी. एन. कौल यांच्या संदर्भातही असाच क्रूरपणा करण्यात आला होता. असे म्हटले जाते की, पीएन कौल जिवंत असताना त्यांच्या शरीराची कातडी सोलून त्यांना मरणासन्न अवस्थेत सोडण्यात आले. तीन दिवसांनी त्यांचा मृतदेह सापडला. ७ मे १९९० या दिवशी प्राध्यापक एल. गंजू आणि त्यांच्या पत्नीची दहशतवाद्यांनी हत्या केली. त्याआधी त्याच्या पत्नीवरही सामूहिक बलात्कार झाला. दहशतवाद्यांपासून वाचण्यासाठी टेलिकॉम इंजिनिअर बी.के. गंजू एका तांदळाच्या पेटीमध्ये शिरला. दहशतवाद्यांनी त्याला घरभर शोधले; पण तो कुठेही सापडला नाही. नंतर दहशतवादी निघून जात असताना, काही शेजाऱ्यांनी तांदळाच्या एका पेटीकडे बोट दाखवले आणि दहशतवाद्यांनी त्यांना त्याच पेटीत गोळ्या घालून ठार मारले. नंतर, त्याचे रक्त मिसळलेल्या तांदळाचा भात त्याच्या पत्नीला खायला देण्यात आला, हे दृश्य ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटातही दाखवले आहे.
एक दिवस अशोक कुमार यांच्या गुडघ्यात गोळी लागली. नंतर त्यांचे केस उपटले गेले, त्यांच्यावर थुंकले, लघवी केली गेली. काश्मिरी कवी सर्वानंद कौल आणि त्यांचा मुलगा वीरेंद्र कौल यांच्यावर क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडण्यात आल्या. सुरुवातीला त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर कट्टरपंथी त्यांना आणि त्यांच्या मुलाला सोबत घेऊन गेले. मग दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह सापडला. कपाळावरची त्वचा सोलून काढली गेली होती. सिगारेटचे चटके संपूर्ण शरीरभर दिसत होते. हाडे तुटली होती. डोळे काढले गेले होते. यानंतर त्यांच्यावर गोळीबारही करण्यात आला. मुजू आणि इतर दोन काश्मिरी पंडितांना इतकी क्रूर वागणूक देण्यात आली की, त्यांना प्रथम रक्तदान करण्याच्या बहाण्याने उचलण्यात आले. नंतर त्यांच्या शरीरातील सर्व रक्त काढून टाकल्यानंतर त्यांना वेदनेने तडफडून मरण्यासाठी सोडून देण्यात आले.
सोपोर येथील इन्स्पेक्टर चुन्नीलाल शल्ला यांनाही रक्तबंबाळ करून ठार मारण्यात आले. त्यांच्या दाढीमुळे दहशतवाद्यांना सुरुवातीला त्यांना ओळखता आले नाही. नंतर इन्स्पेक्टर शल्लांच्या एका सहकारी कॉन्स्टेबलने दहशतवाद्यांना बोलावले. शल्लांच्या गालांची कातडी सोलून त्यांना वेदनेने मरण्यासाठी सोडले.
भूषण लाल रैना यांची २८ एप्रिल १९९० या दिवशी हत्या करण्यात आली. भूषण लाल त्यांच्या आईसोबत काश्मीर खोरे सोडणार होते. रात्री उशिरा दोघेही आपले सामान बांधत असताना दहशतवादी आले आणि त्यांनी त्यांच्या डोक्यात धारदार वस्तूने भोसकले आणि त्यांना घराबाहेर ओढून नेले. नंतर त्यांना नग्न करण्यात आले आणि त्यांच्या शरीरात खिळे ठोकण्यात आले. अनुराधा नावाच्या एका महिलेने तिच्या वेदना व्यक्त करताना म्हटले होते की, कोणीही त्याच्या वडिलांना नग्न पाहिले नसेल; पण तिच्यावर ती वेळ आली होती. तिच्या वडिलांच्या शरीरात इतक्या गोळ्या झाडण्यात आल्या की, शवविच्छेदनानंतर मृतदेह नीट शिवताही आला नाही.
रवींद्र पंडित यांनी अलीकडेच सांगितले की, त्यांचे वडील सरकारी नोकरीमुळे काश्मीरमध्ये रहात होते आणि दहशतवाद्यांनी त्यांना त्यांच्याच बागेत नेऊन त्यांची हत्या केली. ‘पाकिस्तान झिंदाबाद’ म्हटले नाही; म्हणून त्यांच्या शरीरात खिळे ठोकण्यात आले आणि काटेरी तारेचा फास बांधून त्यांना फाशी देण्यात आली.
हा केवळ ९०च्या दशकातील इतिहास नाही, तर आता कलम ३७० (Article 370) रहित केल्यानंतरही ही क्रूरता सुरुच आहे. वर्ष २०२२ मध्येही काश्मिरी पंडितांना लक्ष्य करण्यात आले. शाळेत गैर-मुस्लिम शिक्षकांना निवडकपणे लक्ष्य करण्यात आले. वर्ष २०२४ मध्ये माखनलाल बिंद्रू यांचीही याच ठिकाणी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. नुकतेच अनंतनागमध्ये जिल्हा सरपंच अजय पंडिता यांची हत्या करण्यात आली.
थोडक्यात काय, तर ही मालिका संपणारी नाही. एकेकाळी शारदापीठ असलेल्या काश्मीर खोऱ्यात एक समृद्ध संस्कृती नांदत होती. तेथील निसर्गसौंदर्य, काश्मिरी संस्कृती यांमुळे तो खरेच पृथ्वीवरचा स्वर्ग होता. फाळणीच्या वेळी सर्व मुसलमानांना पाकमध्ये न पाठवल्यामुळे, नेहरूंनी पाकव्याप्त काश्मीरचा विषय संयुक्त राष्ट्रांत सडत ठेवल्यामुळे आणि आतापर्यंत काश्मीर या विषयावर केवळ राजकारणच झालेले असल्याने त्या स्वर्गाचे नरकात रूपांतर झाल्याचे पहावे लागत आहे. आताही पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील घटनेविषयी काही दिवस हळहळ व्यक्त केली जाईल, थोडे रिल्स शेअर केले जातील, स्टेटस, स्टोरीजवर निषेध नोंदवले जातील. काही काळाने हिंदू सगळे विसरून जातील. हे नेहमीचेच झाले आहे. भारतमातेचा मुकुट असलेला काश्मीर प्रांत धर्मांध जिहाद्यांच्या विळख्यातून मुक्त होईपर्यंत सर्व स्तरांवर लढा देणे, हे आता सर्व राष्ट्रप्रेमींचे कर्तव्य आहे. त्या कर्तव्याला जागणे ही पहलगाममध्ये बळी पडलेल्यांना खरी श्रद्धांजली ठरेल ! (Kashmiri Hindus)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community