जितेंद्र आव्हाड पुन्हा बरळले: अफझल खानमुळे छत्रपती शिवाजी आहेत

99

अफझल खान आहेत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आहेत, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवराय  महाराज आहेत, तुम्ही मुलांचा इतिहास काढल्यावर कसे चालेल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. ते पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. तुम्ही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला मुस्लिम वस्त्यांमध्ये जाऊन बघा, किती उत्साहाचे वातावरण असते. मुसलमान वस्तीत उत्साह असतो. त्यांच्या मनात भीती असते अस्तित्वाची. त्यांना सिद्ध करावे लागते की ते भारतीय आहेत किती वर्ष त्यांच्याकडे पुरावा मागणार?, असा सवाल त्यांनी केला.

हे व्यासपीठ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळाले आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकर हे सूत्र उद्ध्वस्त करण्याचे काम काही लोक करत आहेत. हा सगळा सांस्कृतिक दहशतवाद आहे, अजित पवार छत्रपती संभाजी राजेंना काय म्हणाले? यावर महाराष्ट्र पेटला आणि मग आम्हाला सांगावे लागेल. दादोजी कोंडदेव महाराजांचा गुरू नव्हता, असा दावा त्यांनी केला. स्वतःच्या घरात जर गद्दारी झाली तर काय करणार माणूस? जसे संभाजी महाराज यांना समजायला लागले तसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील लोकांची डोकी फिरायला लागली. संभाजी महाराज आणि अष्टमंडळ यांच्यात गैरसमज झाले, असे आव्हाड म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.