Javed Akhtar : भारत पाकिस्तान यांच्यात तणाव असतानाच आता दोन्ही देशांतील कलाकार आमने-सामने आलेले पाहायला मिळाले. त्यातच आता पटकथा लेखक, कवी, गीतकार जावेद अख्तर(Javed Akhtar) यांनी एक विधान केले आहे. ते म्हणाले, पाकिस्तानातील मुस्लिमांनी हिंदूंना त्यांच्या घरातून हाकलून लावले म्हणून त्यांना भारतातील हिंदू भागात घरे मिळत नाहीत.(Javed Akhtar)
पाकिस्तानी अभिनेत्री बुशरा अन्सारीबद्दल जावेद अख्तर(Javed Akhtar) यांना विचारले असता ते म्हणाले, ती कोण मला सांगणारी की मी काय करावे नि काय करु नये?. बुशरा यांनी जावेद अख्तर यांना नसरुद्दीन शाह सारखे शांत राहण्यास सांगितले होते. यावर जावेद अख्तर(Javed Akhtar) यांनी भाष्य केले आहे. तिने एकदा रागाने विचारले होते की मी गप्प का बसत नाही, मी नसीरुद्दीन शाह सारखे गप्प बसले पाहिजे. पण ती मला असे सुचवणारी कोण आहे? मला २५ समस्या असू शकतात, पण तिच्या बाबतीत मी भारतीय आहे.
बुशरा यांनी असेही म्हटले होते की, त्यांना मुंबईत घर भाड्यानेही घेता येत नाही. यावरही जावेद यांनी मिश्किलपणे भाष्य केले. ते म्हणाले, हो, मी आणि शबाना आजकाल फूटपाथवर झोपतो. हे खरे आहे की शबाना सुमारे २५ वर्षांपूर्वी फ्लॅट खरेदी करू इच्छित होती पण ती मुस्लिम असल्याचे सांगून नकार देण्यात आला, असेही ते म्हणाले. हे लोक तेच होते, ज्यांचे पालक सिंधचे होते ज्यांना फाळणीच्या वेळी हाकलून लावण्यात आले, असे जावेद अख्तर(Javed Akhtar) म्हणाले.
ते पुढे म्हणाले, भारत-पाकिस्तान फाळणीच्या जखमा खोलवर आहेत, ती कटुता आमच्यावर ओढवली गेली असे सांगतानाच पण त्यासाठी जबाबदार कोण आहे? भारतात आम्हाला खूप प्रेम मिळाले आहे. तिला(बुशरा) तिच्या स्वतःच्या देशाचा इतिहास पाहण्याची गरज आहे, असेही जावेद अख्तर यांनी सुनावले.(Javed Akhtar)
Join Our WhatsApp Community