-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्यात हिंदी भाषेची सक्ती केली जात असल्याने याला मनसेकडून (MNS) तीव्र विरोध होत आहे. परंतु एकीकडे उर्दु माध्यमाच्या शाळा वाढत असतानाच तसेच दादरमध्ये बंगाली मुस्लिमांची संख्या वाढत असतानाही यावर मात्र ते चूप आहेत. हिंदुत्व टिकवून ठेवणाऱ्या या राजभाषेला विरोध करायचा आणि उर्दु माध्यमांच्या वाढत्या शाळांबाबत बोलायचे नाही, दादरमध्ये वाढणाऱ्या बंगाली मुस्लिमांबाबत बोलायचे नाही हा कुठला विरोध असा सवाल आता हिंदुत्ववाद्यांकडून केला जात आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे हे मुंबईतील वाढत्या उर्दु शाळांबद्दल कधी बोलणार? बंगाली मुस्लिमांना कधी विरोध करणार असाही प्रश्न आता जनता विचारताना दिसत आहे.
मुंबईसह राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्यात आल्यानंतर याला मनसेच्यावतीने (MNS) तीव्र विरोध करण्यात येत आहे. मनसेने (MNS) जाहीरपणे हा विरोध नोंदवत राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात येणार असले तरी आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपवून घेणार नाही असा इशाराच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यानंतर पक्षाचे नेते संदीप देशपांडे यांनी आराखड्याच्या प्रती जाळून याचा निषेध नोंदवला.
(हेही वाचा – सरकारकडून Hindi सक्ती मागे!)
मनसेचे (MNS) नेते संदीप देशपांडे हे हिंदी भाषेला ज्याप्रकारे विरोध करत आहे ते पाहता ते हिंदीला विरोध करून उर्दुला पाठिंबा देता का असा सवाल उपस्थित होत आहे. देशपांडे हे कधीही बांग्लादेशी मुस्लिमांबाबत बोलत नाही, पण हिंदी भाषेला मात्र प्रखर विरोध करत आहे. मुंबईमध्ये सन २०१८ मध्ये मराठी माध्यमाच्या ३१४ शाळा होत्या, त्यात ५२ शाळा बंद होवून ही संख्या आता २६२ वर आली आहे. विद्यार्थी पटसंख्या लक्षात घेतली तर या कालावधीत तब्बल पावणे नऊ हजार विद्यार्थी घटले आहेत. सन २०१८ मध्ये मराठी शाळांमध्ये ४२ हजार ५३५ विद्यार्थी होते, ते आता ३३ हजार ७३९ एवढे आहेत.
जर उर्दु शाळांच्या बाबतीत माहिती घेतली तर लक्षात येते की, सन २०१८ मध्ये उर्दु माध्यमाच्या १९९ शाळा होत्या त्या आता १८८ एवढ्या झाल्या आहेत. या माध्यमाच्या शाळांची संख्या ११ ने घटली आहे. तर विद्यार्थी संख्या ही सन २०१८ मध्ये ७०,१६३ एवढी होती, ती संख्या आता सन २०२४मध्ये ६४ हजार ३९१ एवढी झाली आहे. त्यामुळे उर्दु माध्यमांच्या शाळांची संख्या झपाट्याने कमी होत नसली तरी त्यांच्या शाळांची संख्या ही आता मराठी, हिंदीच्या खालोखाल आहे. मराठीच्या खालोखाल आता हिंदी भाषिक शाळांना टक्कर देत उर्दु भाषिक शाळा मराठीच्या आसपास येऊन उभ्या राहिल्या आहेत.
विशेष म्हणजे सध्या मराठी माध्यमाच्या २६२ शाळांमध्ये केवळ ३३ हजार ७३९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर उर्दु माध्यमाच्या १८८ शाळांमध्ये तब्बल ६४ हजार ३९१ विद्यार्थी शिक्षण घेत आहे, म्हणजे मराठी विद्यार्थ्यांच्या संख्येच्या दुप्पट उर्दु माध्यमातील विद्यार्थ्यांची संख्या आहे. उर्दु माध्यमाच्या शाळा कमी पण पटसंख्या मराठीपेक्षा अधिक असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. एका बाजूला उर्दु भाषिक शाळांची आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढताना याचे मनसेला काही सोयरसुतक नसून केवळ मतांसाठी मनसे (MNS) बेगडी भाषाप्रेम दाखवत असल्याचे हिंदी भाषेच्या विरोधामुळे दिसून येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community