Iran Israel Conflict : इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी सरकारने स्थापन केला नियंत्रण कक्ष, हेल्पलाइन क्रमांकही केला जारी

115
इराण (Iran) आणि इस्रायलमध्ये (Israel) सुरू असलेल्या युद्धामुळे भारत सरकार (Indian Government) हाय अलर्टवर आहे. इराणमधून मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे. यासाठी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (Indian Foreign Ministry) एक नियंत्रण कक्ष (Control Room) स्थापन केला आहे. इराणमधून बाहेर काढल्या जाणाऱ्या भारतीयांसाठी हा नियंत्रण कक्ष २४ तास सेवा देईल. (Iran Israel Conflict)

(हेही वाचा – Dahisar Police : महिला तरुणींना टार्गेट करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला कर्नाटक येथून अटक )

भारत सरकार परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे आणि युद्धग्रस्त भागातून भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सर्व शक्य उपाययोजना करत आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, नियंत्रण कक्ष २४x७ सक्रिय राहील आणि बाधित नागरिकांना त्वरित मदत पुरवली जाईल. या मोहिमेअंतर्गत मोठ्या संख्येने भारतीयांना इराणमधून सुरक्षितपणे बाहेर काढले जात आहे. सरकारने हेल्पलाइन क्रमांक देखील जारी केले आहेत. तसेच, तुम्ही तुमच्या प्रियजनांबद्दल सरकारकडून मेलद्वारे माहिती मिळवू शकता.
भारतात जारी केलेले हेल्पलाइन नंबर
१८००११८७९७ (टोल फ्री)
+९१-११-२३०१२११३
+९१-११-२३०१४१०४
+९१-११-२३०१७९०५
+९१-९९६८२९१९८८ (व्हॉट्सअॅप)
[email protected] (मेल आयडी)
(हेही वाचा – ‘लाज वाटली पाहिजे!’ म्हणत Bombay High Court राज्य सरकारवर संतापलं; नेमकं काय प्रकरण ? वाचा…)
इराणमध्ये देखील जारी केलेले हेल्पलाइन नंबर
याव्यतिरिक्त, इराणची राजधानी तेहरानमधील भारतीय दूतावासाने (Indian Embassy) खाली दिलेल्या संपर्क तपशीलांसह २४x७ आपत्कालीन हेल्पलाइन सुरू केली आहे.
फक्त कॉलसाठी:
+९८ ९१२८१०९११५
+९८ ९१२८१०९१०९
व्हॉट्सअॅपसाठी:
+९८ ९०१०४४५५७
+९८ ९०१५९९३३२०
+९१ ८०८६८७१७०९
बंदर अब्बास:
+९८ ९१७७६९९०३६
⁠जाहेदान:
+९८ ९३९६३५६६४९
[email protected] (मेल आयडी)

(हेही वाचा – Israel Iran War: इस्रायलने इराणी टीव्ही स्टुडिओवर केला हल्ला; टीव्ही अँकरने काढला स्टुडिओमधून पळ, व्हायरल VIDEO आला समोर)

भारतीयांना बाहेर काढण्याचे प्रयत्न
भारताने इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी आपले प्रयत्न वाढवले ​​आहेत. पहिल्या तुकडीत, सोमवारी रात्री १०० भारतीय नागरिकांना इराणहून रस्तेमार्गे आर्मेनियाला पाठवण्यात आले. नवी दिल्ली आणि तेहरानमधील राजनैतिक चर्चेनंतर हे पाऊल शक्य झाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.