ICT : उद्योगपती मुकेश अंबानी यांनी दिली १५१ कोटींची देणगी; म्हणाले, ‘गुरदक्षिणा म्हणून…’

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी(ICT), मुंबईला रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख व प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी यांनी १५१ कोटींची देणगी दिली आहे. मुकेश अंबानी यांनी गुरू दक्षिणाचा उल्लेख करत आयसीटी(ICT) संस्थेला कोट्यावधींचे दान दिले आहे.

111

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी(ICT), मुंबईला रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख व प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी यांनी १५१ कोटींची देणगी दिली आहे. मुकेश अंबानी यांनी गुरू दक्षिणाचा उल्लेख करत आयसीटी(ICT) संस्थेला कोट्यावधींचे दान दिले आहे. यावेळी उद्योगपती मुकेश अंबानी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, आमचे गुरू प्राध्यापक शर्मा यांना गुरूदक्षिणा म्हणून हे दान दिले आहे.(ICT)

दरम्यान, अनिता पाटील यांच्या ‘द डिव्हाईन सायंटिस्ट’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांनी देणगी जाहीर केली. ‘द डिव्हाईन सायंटिस्ट’ हे पुस्तक पद्मविभूषण प्राध्यापक मनमोहन शर्मा यांच्या जीवनावर आधारित असून प्राध्यापक शर्मा हे उद्योगपती मुकेश अंबानी यांचे देखील गुरू राहिले आहेत. यावेळी अंबानी यांनी सांगितले की, मुकेश, तुला आयसीटीसाठी काहीतरी मोठे करावे लागेल, असे प्रोफेसर शर्मा म्हणायचे. त्यामुळे हे फक्त त्यांच्यासाठी आहे, असेही ते म्हणाले.

(हेही वाचा ‘…जेव्हा जर्मन चान्सलर Donald Trump यांना त्यांच्या आजोबांचे जन्म प्रमाणपत्र भेट देतात’; वाचा नेमकं काय झालं? )

मुकेश अंबानी यांनी भारतीय रासायनिक उद्योगाच्या विकासाचे सर्व श्रेय यावेळी प्राध्यापक शर्मा यांना दिले. ते पुढे म्हणाले, मी आयआयटी-मुंबईऐवजी मुद्दाम यूडीसीटीची निवड केली. ते म्हणाले, यूडीसीटी कॅम्पसला भेट देणे नेहमीच एखाद्या पवित्र मंदिराला भेट दिल्यासारखे वाटते. प्रोफेसर शर्मा यांना मी माझे सर्वात आदरणीय गुरु, माझे मार्गदर्शक आणि प्रेरणास्रोत मानतो, असेही मुकेश अंबानी यांनी सांगितले.

 

प्रो. शर्मा यांच्याबद्दल बोलताना मुकेश अंबानी म्हणाले, त्यांच्याकडे कुतूहलाचे ज्ञानात, ज्ञानाचे व्यावसायिक मूल्यात आणि ज्ञान आणि व्यावसायिक मूल्य दोन्हीचे शाश्वत बुद्धिमत्तेत रूपांतर करण्याची शक्ती आहे. आयसीटी पूर्वी विद्यापीठ रासायनिक तंत्रज्ञान विभाग म्हणून ओळखले जात असे असे सांगतानाच याची स्थापना १९३३ मध्ये मुंबई विद्यापीठाने केली. २००८ मध्ये, त्याचे नाव बदलण्यात आले असून अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला.(ICT)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.