Stockholm Syndrome : हिंदू स्टॉकहोम सिंड्रोमने ग्रस्त!

349
Stockholm Syndrome : हिंदू स्टॉकहोम सिंड्रोमने ग्रस्त!
Stockholm Syndrome : हिंदू स्टॉकहोम सिंड्रोमने ग्रस्त!
  • जयेश शत्रुघ्न मेस्त्री

पहलगाममध्ये इस्लामी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात धर्म विचारुन गोळ्या घातल्या गेल्या ही बातमी बाहेर येताच अनेकांना आश्चर्य वाटलं. आपल्याला एक संवाद म्हणायची पद्धत आहे, ‘सगळेच मुसलमान काय वाईट नसतात.’ म्हणजे अनेक मुसलमान आपला व्यवसाय, नोकरी, मुलं बाळं यात गुंतलेले दिसतात. ‘मग चांगल्या मुसलमानांचं काय करायचं?’ हा प्रश्न सुद्धा ओघाने येतोच. ही दोन वाक्ये फक्त महाराष्ट्रात किंवा आपल्या देशातच विचारली जातात असं नव्हे. ही दोन्ही वाक्ये जगभरात उच्चारली जातात. ही वाक्ये स्टॉकहोम सिंड्रोमचे (Stockholm Syndrome) उत्तम उदाहरण आहे. स्टॉकहोम सिंड्रोमची व्याख्या पुढीलप्रमाणे आहे. ‘स्टॉकहोम सिंड्रोम ही एक मानसिक स्थिती आहे ज्यामध्ये अपहरण किंवा अत्याचाराला बळी पडलेल्या पीडितांच्या मनात त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या पाशवी लोकांबद्दल सकारात्मक भावना निर्माण होते.’ म्हणजे ज्या लोकांनी तुमच्यावर अत्याचार केले आहेत किंवा करत आहेत त्यांच्याबद्दल तुमच्या मनात प्रेम किंवा आपुलकीची भावना उत्पन्न होणं यालाच स्टॉकहोम सिंड्रोम (Stockholm Syndrome) म्हणतात. या विकाराची नोंद अतिशय दुर्मिळ म्हणून केली गेली असली याबाबतीत मात्र संसर्गजन्य रोगासारखा पसरत आहे. आपण जोपर्यंत मूळ समजून घेणार नाही, तोपर्यंत आपल्याला त्यावर उपाय सापडणार नाही. पहलगाम (Pahalgam) हल्ल्यावर लेखिका तस्लिमा नसरीन (Taslima Nasrin) यांचं ट्विट अतिशय बोलकं आहे. ‘जोपर्यंत इस्लाम अस्तित्वात आहे तोपर्यंत दहशतवाद अस्तित्वात राहील. जोपर्यंत इस्लाम अस्तित्वात आहे तोपर्यंत गैर-मुस्लिमांना संरक्षण मिळणार नाही, मुक्त विचारवंतांना आणि बुद्धिवाद्यांना संरक्षण मिळणार नाही, महिलांना संरक्षण मिळणार नाही. जोपर्यंत इस्लाम जिवंत आहे तोपर्यंत फुले कोमेजत राहतील, मुले मरत राहतील, लाखो मृत पारव्यांचा वर्षाव होत राहील. इस्लामच्या गर्भाशयातून द्वेष जन्माला येत राहील, विक्षिप्त राक्षस जन्माला येत राहतील. जोपर्यंत इस्लाम अस्तित्वात आहे, तोपर्यंत कोणतेही राज्य, कोणतेही राष्ट्र सुसंस्कृत होऊ शकणार नाही, जग सुसंस्कृत होऊ शकणार नाही.’

(हेही वाचा – Jhelum River ला पूर; पाकिस्तानी माध्यमांनी भारतावर फोडले खापर)

वक्फ बिलावरुन नागपुरात (Nagpur) जे झालं ते काय होतं? ते काय पाकिस्तानी होते का? ते हिंदुस्थानी नागरिकच होते. नागपूरचा स्वभाव वेगळा आहे, स्थानिक नव्हते वगैरे बनावट कहाण्या सांगण्यात आल्या. पण कित्येक स्थानिकांनाच अटक झालेली आहे हे सत्य आहे. बंगालमध्ये हिंदुंना घरं-दारं सोडून पळून जावं लागत आहे. त्यांना पळवणारे कोण आहेत? ते तर प्रशिक्षित आतंकवादी नाहीत. ते स्थानिकच आहेत. पहलगाममध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला केला असं आपण म्हणतोय पण १५०० पेक्षा अधिक स्थानिकांवर कारवाई करण्यात येत असल्याच्या बातम्या माध्यमांत आहेत. म्हणजेच स्थानिकांनीच अतिरेक्यांना आत येऊ दिलं. या कटात स्थानिक लोक सहभागी होते. आता सुद्धा अशा प्रकारचं नॅरेटिव्ह पसरवलं जात आहे की हा हल्ला पाकिस्तानचा आहे. जरी धर्म विचारुन मारलं असलं तरी स्थानिकांचा आणि इतर मुस्लिमांचा काय दोष? या आधी तर धर्म विचारुन मारलंच नाही असं नॅरेटिव्ह होतं. आपण आतंकवाद्यांचा राग राग करत असताना इतरांचा द्वेष करु नये याचं भान ठेवयला हवं. निवडणूक आल्या की असे हल्ले होत असतात. वगैरे वगैरे अशा प्रकारचं नॅरेटिव्ह पसरवलं जात आहे. आता कोणती निवडणूक आली आहे? हे त्यांना सांगता येत नाही. पण यांची मॉडस ऑपरेंडी पाहा, जे गुन्हा करतात त्यांना हे पुरोगमी दुषणे देत नाहीत. म्हणजे गुन्हा केला इस्लामी अतिरेक्यांनी, बरं त्यांनी सरळ सरळ दाखवून दिलं की आम्ही हिंदुंनाच मारतोय. त्यातही या हल्ल्यातली एक महत्त्वाची बाब म्हणजे, ज्यावर फार चर्चा झाली नाही, फक्त पुरुषांनाच मारण्यात आलेलं आहे. याचं उत्तर तुम्ही शोधायला हवं. याचं उत्तर तुम्हाला इस्लामचा अभ्यास केल्यावर नक्कीच सापडेल. एक्स मुस्लिम सलीम यांना पहलगाम (Pahalgam) हल्ल्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ‘अगर हम अपने नजरिये से बोलेंगे तो ये गलत हुआ है, ये आतंकवादी हमला है, ये मानवता के खिलाफ है. लेकिन अगर आप इसे इस्लाम की नजरिये से देखोगे तो उन्होने यह पुण्य का काम किया है.’ याचा अर्थ सलीम यांना असं म्हणायचं आहे की तुम्हाला असं वाटतं की लोकांना मारणं, त्यांच्यावर अत्याचार करणं हे वाईट असतं आणि वाईट लोक हे करतात. पण त्यांच्यात हे पुण्यकर्म आहे. यात वाईट काहीच नाही. त्यामुळे हिंदु-मुस्लिम करुन द्वेष पसरवू नका या वाक्याचा आता कंटाळ आला आहे. कधी नव्हे तो हिंदू आता वैतागलेला आहे. तरी सुद्धा बहुसंख्य हिंदू आजही वरील दोन वाक्ये उच्चारतात. कारण स्टॉकहोम सिंड्रोम. (Stockholm Syndrome) ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सन्मति दे भगवान’ भजनामुळे हिंदूला हा विकार झाला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

(हेही वाचा – Pune : पाणी टंचाई संकट ! दररोज दीड लाख पुणेकरांना टँकरचा आधार)

तुम्ही कधी विचार केलाय का की अचानक दंगली होतात आणि समोरुन महाभयंकर असे शस्त्र उगारली जातात. ज्यात खास करुन दगड आणि पेट्रोल बॉम्बचा वापर केला जातो. विचार करा एखादी अफवा पसरल्यामुळे दंगल झाली किंवा छोट्याशा भांडणावरुन दंगल होते तेव्हा ट्रकभरुन दगड येतात कसे? पेट्रोल बॉम्बचा साठा कसा तयार मिळतो? एवढ्या कमी वेळात या सर्व गोष्टी कशा तयार करता येतात? म्हणजे दंगली पूर्वनियोजित असतात का? तर याचं उत्तर असं आहे की ते मनातून युद्धासाठी तत्पर असतात. कधीही युद्ध होऊ शकतं आणि आपल्याला रस्त्यावर उतरावं लागू शकतं ही त्यांची तयारी असते. त्यामुळे हिंदुंनी लवकरात लवकर या विकारावर उपचार करुन घेतला पाहिजे. काही वर्षांपूर्वी विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) नावाचे एक सुप्रसिद्ध डॉक्टर होऊन गेले आणि त्यांनी या विकारावर एक लस काढली होती. त्या लसीचं नाव होतं हिंदुत्व. ही लस जर तुम्ही घेतली तर हा विकार तुम्हाला होणार नाही. दो बुंद जिंदगी के! हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.