८० दिवसांपूर्वी गायब झालेल्या Hindu बहिणींचे धर्मांध मुसलमानांनी केले ब्रेनवॉश; मुस्लिम मैत्रिणीने फसवले

या प्रकरणात एफआयआर नोंदवल्यानंतर तपास सुरू करण्यात आला. पोलिसांच्या सुरुवातीच्या तपासात धक्कादायक खुलासे झाले आहेत. पोलिसांना हे प्रकरण 'द केरळ स्टोरी' चित्रपटासारखे असल्याचे आढळून आले आहे.

134

आग्रामध्ये एका हिंदू (Hindu) कुटुंबातील २ मुलींना धर्मांतर करणाऱ्या टोळीने जाळ्यात अडकवले आहे. त्यांनी प्रथम मोठ्या बहिणीला लक्ष्य केले आणि नंतर ती धाकट्या मुलीला सोबत घेऊन गेली. हिंदू मुलींचे ब्रेनवॉश करणारी महिला जम्मू-काश्मीरची रहिवासी आहे. दोन्ही मुली गेल्या ३ महिन्यांपासून बेपत्ता आहेत. आता आग्रा पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.आग्राचे सायबर पोलिसही या प्रकरणाच्या तपासात सहभागी आहेत. या प्रकरणात सायबर पोलिसांना धर्मांतर करणाऱ्या टोळीचे धागेदोरे सापडले आहेत, जे भारताच्या विविध भागात पसरले आहे. आता या प्रकरणात तपास सुरू आहे.

आग्रा येथील एका हिंदू (Hindu) कुटुंबातील मोठी मुलगी २०२१ मध्ये बेपत्ता झाली. पीडितेच्या कुटुंबाने सांगितले आहे की, ही मुलगी आग्राच्या दयालबाग शैक्षणिक संस्थेतून शिक्षण घेत आहे. या मुलीची एका मुस्लिम मुलीशी मैत्री होती.  पीडितेच्या कुटुंबाने पोलिसांना सांगितले की त्यांची मुलगी साईमा नावाच्या मुलीशी मैत्री करत होती जी कथितपणे जम्मू-काश्मीरमधील उधमपूरची रहिवासी होती. या सायमा उर्फ खुशबूने हिंदू (Hindu) मुलीचे ‘ब्रेनवॉश’ केले होते. बेपत्ता झालेल्या मोठ्या मुलीच्या वडिलांनी सांगितले की यामुळे ती २०२१ मध्ये गायब झाली होती. बेपत्ता झालेल्या मुलीच्या वडिलांनी सांगितले की त्यांची मोठी मुलगी सायमामुळे दुसऱ्या धर्माच्या प्रभावाखाली होती.

(हेही वाचा Ahmedabad Plane Crash मागील खरे कारण येणार समोर; कारण…)

दुसरी मुलगीही ब्रेनवॉश 

पीडित कुटुंबाने सांगितले की त्यांची मोठी मुलगी इतकी प्रभावित झाली होती की घरी आल्यानंतर तिने तिच्या धाकट्या बहिणीचे ब्रेनवॉशिंग सुरू केले आणि त्यात ती यशस्वी झाली. यानंतर, २५ मार्च २०२५ रोजी दोन्ही मुली आग्रा येथील त्यांच्या घरातून गायब झाल्या. त्यांचा कोणताही पत्ता लागला नाही. त्या कोणासोबत गेल्या आणि कुठे गेल्या याबद्दल कुटुंबाकडे एकही माहिती नाही. यामुळे कंटाळून कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेतली. सुरुवातीला पोलिसांनी दोन्ही मुली प्रौढ असल्याबद्दल कारवाई करण्यात हलगर्जीपणा दाखवला. तथापि, ४ मे २०२५ रोजी या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यात आला. एफआयआरमध्ये पीडितेच्या वडिलांनी स्पष्टपणे म्हटले आहे की साईमाने त्यांच्या दोन्ही मुलींना पळवून नेले आहे. त्यांनी असाही आरोप केला आहे की साईमाने त्यांच्या मुलींना लग्नासाठी घेऊन गेली आहे. (Hindu)

पोलिसांच्या तपासात धर्मांतर टोळीचा पर्दाफाश

या प्रकरणात एफआयआर नोंदवल्यानंतर तपास सुरू करण्यात आला. पोलिसांच्या सुरुवातीच्या तपासात धक्कादायक खुलासे झाले आहेत. पोलिसांना हे प्रकरण ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटासारखे असल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी सांगितले आहे की या दोन्ही बहिणी आता इस्लामिक धर्मांतर टोळीचा भाग बनल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांना असेही आढळून आले आहे की या प्रकरणाचे धागेदोरे जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल आणि दिल्ली-एनसीआरशी देखील जोडलेले आहेत. पोलिस अधिक माहिती काढत आहेत. याशिवाय, हे प्रकरण आग्रा सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. (Hindu)  पोलिसांचे सायबर तज्ञ सोशल मीडिया अकाउंट्स आणि त्यांच्या हालचालींची माहिती तपासत आहेत. पोलिसांना काही सोशल मीडिया आयडी सापडले आहेत, ज्यांची हालचाल संशयास्पद वाटते आणि धर्मांतरसारख्या बाबींशी संबंधित आहे. पोलिस संपूर्ण नेटवर्क उघड करण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.