राज्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. ऑफिसला निघालेल्या लोकांचीही चांगलीच तारांबळ उडाली. या पावसाचा थेट परिणाम मुंबई लोकलवर पडला आहे. पुण्यातील काही नद्यांनी धोक्याची पातळी देखील ओलांडली आहे. राज्यभर पाऊस पडत आहे. मुळात म्हणजे यंदा राज्यात मॉन्सून लवकर दाखल झाला. मात्र, शेतकऱ्यांनी अजून पेरणीला सुरुवात केली नाही. या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचेही बघायला मिळत आहे.
मुंबईतील मेट्रो 1 ची सेवा सोमवारी दुपारी ठप्प झाली होती. आझाद नगर रेल्वे स्थानकात ताडपत्री ओव्हरहेडमध्ये अडकल्याने हा तांत्रिक बिघाड झाला होता. 15 मिनिटांनी वाहतूक पूर्ववत झाली आहे. घाटकोपरमध्येही पाणी भरताना दिसत आहे. लांजा बसस्थानकात पाणी भरले आहे. रत्नागिरी कशेडी बोगद्यामुळे दरड कोसळली. लोणावळ्यातील भूशी डॅम ओव्हरफ्लो झाला असून पर्यटकांनी गर्दी केली आहे. पुण्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) लोणावळ्यातील भूशी डॅम 100 टक्के भरला असून ओव्हरफ्लो झाला.
(हेही वाचा Meta AI Video Editing : फेसुबकवर आता एआयच्या मदतीने व्हिडिओही होणार एडिट)
उल्हासनगर येथे 500 पेक्षा जास्त घरांचा येण्या-जाण्याचा मार्ग झाला बंद झाला. नाल्यावरील पूल कोसळतानाची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) नाल्यावरील पूल तुटला आहे. मुसळधार पावसामुळे उल्हासनगरच्या गणेश नगर भागात नाल्यावरील पूल कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे लोकांना आपल्या घराच्याबाहेर निघणे देखील शक्य होत नाही. सातत्याने पडणारा मुसळधार पाऊस यामुळे चिपळूणच्या वाशिष्ठी नदीपात्राची पातळी वाढली आहे.
पुण्यातील मुळशी तालुक्यात रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने (Heavy Rain) पिरंगुट परिसरात हाहाकार उडाला आहे. पुणे कोलाड महामार्गावरील तात्पुरता बांधलेला भराव रस्ता पाण्याच्या लोंढ्याने वाहून गेला आहे. अजूनही पावसाचा जोर कायम असल्याचे बघायला मिळत आहे. पुढील काही तासांसाठी पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. यामुळे नागरिकांनी खूप महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळावेच. भारतीय हवामान विभागाने 24 तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट दिला होता.
Join Our WhatsApp Community