-
प्रतिनिधी
राज्यात रविवारपासून तळ ठोकलेल्या पावसाने सोमवारीही झोडपून काढले. मुसळधार पाऊस झाल्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह कोकण किनारपट्टीसह अनेक भागांत पूर स्थिती निर्माण झाली होती. मागील २४ तासांत १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली. (Heavy Rain)
राज्यात यंदा मे दुसऱ्या आठवड्यात पावसाने आगमन झाले. सलग दोन आठवडे राज्यभरात धो-धो पाऊस झाला. अधून मधून सरी, रिपरिप करणाऱ्या पावसाने मागील दडी मारली. खरिपाच्या पेरण्या करण्यास अवधी मिळाल्याने शेतकरी वर्ग सुखावला होता. शहरी भागांत उकाड्यामुळे नागरिक हवालदिल झाले होते. अखेर रविवारी १५ जूनपासून पुन्हा एकदा पावसाला सुरूवात झाली. पहाटेपासून रिपरिप करणाऱ्या पावसाने सकाळी ११ वाजता जोर धरला. सोमवारी १६ जूनला राज्यभरात पावसाची दिवसभर तुफान बॅटींग सुरू होती. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड कोकण किनारपट्टीत वादळीवाऱ्याेने झोडपून काढले. अनेक भाग पाण्याखाली गेले होते. रत्नागिरीतील जगबुडी नदीने धोक्याची इशारा पातळी ओलांडली. वाशिष्ठी, सावित्री नदीला पूर आला होता. नागरीकांना त्यामुळे सतर्क राहावे. प्रशासनामार्कत एनडीआरएफ व एसडीआरएफ स्थानिक यंत्रणांनी समन्वय साधून मदतीच्या सूचना आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून देण्यात आल्या आहेत. (Heavy Rain)
(हेही वाचा – Heavy Rain : राज्यात पावसाचा ‘पॉवर प्ले’; अनेक ठिकाणी नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी)
दरम्यान कोकणातील रायगड, रत्नगिरी या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. तर अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार, पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग, ठाणे, पुणे, सातारा, नाशिक, मुंबई उपनगर, जालना या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोल्हापूर घाट, पुणे घाट, सातारा घाट, यांनाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आला आहे. (Heavy Rain)
विविध घटनांमध्ये १८ लोकांचा मृत्यू
गेल्या २४ तासात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे. पडझडीच्या घटना, रस्ते अपघात, भिंत पडून, नाल्यात पडून, नदीवरील लोखंडी पूल पडून, पाण्यात पडून, दरीत पडून अशा विविध कारणामुळे १८ लोकांचा मृत्यू झाला. तर ६५ लोक जखमी झाले आहेत. अशी माहिती राज्य सरकारने दिली आहे.
गेल्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस कुठे?
- रत्नागिरी – ११२.७ मि. मी.
- सिंधुदुर्ग – ११०.७ मि. मी.
- मुंबई शहर – १००.४ मि. मी.
- मुंबई उपनगर – ८६.० मि. मी.
- रायगड – ७२ .१ मि. मी.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community