मागील चार दिवसांपासून राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची बॅटिंग (Monsoon) सुरु होती. ३५ वर्षांनंतर प्रथमच राज्यात मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात इतका पाऊस झाला. राज्यात वेळेआधीच मान्सून दाखल झाल्याच्या बातम्याही आल्या, पण मंगळवार, २७ मे रोजी पावसाने उघडीप घेतली. तसेच मान्सूनबद्दल एक नवीन अपडेट आली. भारतात सुरु झालेल्या पावसाची गती मगंळवारपासूनच मंदावणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. कारण पश्चिम रशियावर तयार होणाऱ्या जास्त दाबाच्या पट्ट्याचा परिणाम यावेळी पहिल्यांदाच भारताच्या मोसमी पावसावर (Monsoon) होईल, असे मत इंग्लंड येथे हवामान तज्ज्ञांचे ज्ज्ञ डॉ. अक्षय देवरस यांनी व्यक्त केले.
त्यांच्या अंदाजानुसार, २७ मे पासून राज्यातील हवामान हळूहळू कोरडे होईल आणि काही प्रमाणात तापमानात वाढही होईल. मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. किमान पाच जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार आहे. यामुळे पाच जूनपर्यंत तरी राज्यातील बहुतांश भागात मोसमी पावसाची (Monsoon) शक्यता दिसत नाही. या दरम्यान देशातील इतर भागात सुद्धा मोसमी पावसाचा प्रवास तात्पुरता थांबू शकतो. यावर्षी राज्यातील अनेक भागात वादळी पाऊस पडला. त्यामुळे मोसमी पाऊस लवकरच दाखल होईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
काय आहे कारण ?
२७ मे च्या सुमारास पश्चिम रशियावर एक जास्त दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच विदेशातील हवामान बदलाचा परिणाम भारतावर होणार आहे. रशियावर निर्माण होणारा कमी दाबाचा पट्टा भारतातील आणि विशेषकरून महाराष्ट्रातील मोसमी पावसावर (Monsoon) नकारात्मक परिणाम करेल. तो वाऱ्यांच्या दिशेत मोठे बदल घडवून आणणार आहे. ज्यामुळे २७ मे नंतर पाकिस्तान, अफगाणिस्तानसारख्या देशाकडून मोठ्या प्रमाणात कोरडी हवा अरबी समुद्राकडे आणि भारताकडे येणार आहे. ही कोरडी हवा महाराष्ट्रासह भारतातील इतर भागात पसरेल. ज्यामुळे मोसमी पावसाचा पुढचा प्रवास किमान पाच जूनपर्यंत रखडणार आहे, असे नॅशनल सेंटर फॉर ॲटमॉस्फेरिक सायन्स अँड डिपार्टमेंट ऑफ मेट्रिओऑलॉजी, रीडिंग युनिव्हर्सिटी, यूकेचे संशोधन शास्त्रज्ञ डॉ. अक्षय देवरस यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community