“दहा कोटी झाडांची हरित क्रांती!”; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची ऐतिहासिक घोषणा

137
“दहा कोटी झाडांची हरित क्रांती!”; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची ऐतिहासिक घोषणा
  • प्रतिनिधी

राज्यातील वनाच्छादनात लक्षणीय वाढ साधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षी राज्यात दहा कोटी झाडे लावण्याची मोठी घोषणा केली आहे. ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत ही भव्य मोहीम राबविण्यात येणार असून ही केवळ सरकारी योजना न राहता लोकचळवळ बनावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) केले.

‘हरित महाराष्ट्र’ साठी पुढील वीस वर्षांचे विजन

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत बोलताना मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) म्हणाले, “राज्यातील वनाच्छादन ३३ टक्क्यांवर नेण्यासाठी ही मोहीम दीर्घकालीन व्हिजनने राबविणे आवश्यक आहे. यापूर्वी आपण ३३ कोटी आणि ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट गाठले असून यंदाचेही उद्दिष्ट नक्कीच गाठू.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक पेड माँ के नाम’ अभियानात महाराष्ट्राने देशात आघाडी घेतल्याचा गौरवही यावेळी करण्यात आला.

(हेही वाचा – आता आयटीआयमध्ये एआय, रोबोटिक्स, ड्रोन टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम; कौशल्य विकासमंत्री Mangal Prabhat Lodha यांची घोषणा)

तंत्रज्ञानाचा आधार – अचूक देखरेख व पारदर्शकता

मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट निर्देश दिले की, “कृत्रिम बुद्धिमत्ता, रिमोट सेन्सिंग आणि उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करून झाडांची देखरेख व त्यांचे जिवंत राहण्याचे प्रमाण वाढवावे.” यासाठी बांधकाम विभागाच्या वतीने विशेष अँप प्रणाली तयार करण्यात आली असून अँड्रॉईड व आयओएस प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या या अँपचे उद्घाटन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

महामार्गावरील वृक्षारोपणाची जबाबदारी आता वन विभागाकडे

राज्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर, पालखी मार्गांवर झाडे लावण्याची जबाबदारी वन विभागाकडे दिली जाणार आहे. याशिवाय गडचिरोली जिल्ह्यात एक कोटी वृक्ष लागवडीचा स्वतंत्र प्रकल्प हाती घेण्यात येणार असून जोतिबा डोंगर परिसरातही व्यापक वृक्षारोपण होणार आहे.

(हेही वाचा – Water Conservation Department : सुधारित बृहत आराखडा तयार करत दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन; मंत्री Sanjay Rathod यांची घोषणा)

मराठवाडा, बीड, लातूरमध्ये विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय

मराठवाड्यातील वृक्षांची कमी संख्या लक्षात घेता बीड, लातूरसारख्या जिल्ह्यांमध्ये विशेष वृक्षारोपण मोहीम राबविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) दिले. “बांबू मिशन ही संकल्पना सर्व विभागांनी एकत्रितपणे राबवावी,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

“देशी, सावली देणाऱ्या झाडांना प्राधान्य द्या” – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री पवार यांनी महामार्ग कडेला झाडे लावताना रस्ता रुंदीकरणाचा विचार करून जांभूळ, वड, पिंपळ, कडुलिंब यांसारख्या देशी झाडांचे महत्त्व पटवून दिले. विविध विभागांनी मोहिमेत भाग घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

(हेही वाचा – Vishalgad Bakri Eid : विशाळगडावरील उरुसाला उच्च न्यायालयाची परवानगी; कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना संतप्त)

“दहा कोटी वृक्ष लागवड निश्चितपणे यशस्वी करू” – वनमंत्री गणेश नाईक

वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की, झाडांच्या लागवडीसाठी ‘कॅम्पा’ निधीचा प्रभावी वापर केला जाईल आणि महामार्गांवरही दर्जेदार वृक्षारोपण केले जाईल. “दहा कोटी झाडांची लागवड ही एक सामूहिक जबाबदारी आहे, ती यशस्वी करणारच,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वृक्षारोपण मोहिमेचा पाया – मजबूत नर्सरी आणि जनसहभाग

मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले की, मोहीम यशस्वी होण्यासाठी दर्जेदार रोपांची नर्सरी महत्त्वाची आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदा आणि सामाजिक संस्था यांना सहभागी करून घेण्याचेही निर्देश देण्यात आले. या दहा कोटी वृक्ष लागवड मोहिमेद्वारे महाराष्ट्र केवळ हरित राज्यच ठरणार नाही, तर पर्यावरण संतुलनात भारतासाठी आदर्श उदाहरणही ठरणार आहे!

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.