Punyashlok Ahilyadevi Holkar : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर सरकार चित्रपट काढणार

केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात अहिल्यामातांचे चरित्र, त्यांचे कर्तृत्व शेवटच्या माणसापर्यंत पोहोचले पाहिजे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

105
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilyadevi Holkar) यांच्या जीवनावर राज्य सरकार चित्रपट काढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पुण्यश्लोकी आहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती. याच दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली.
राज्य सरकार हा चित्रपट बहुभाषिक काढणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार असताना अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचा निर्णय आपण घेतला. राम शिंदे आणि आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आजच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते. यासाठी मी जेव्हा पंतप्रधान मोदी यांना भेटलो आणि सांगितले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilyadevi Holkar) यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमासाठी निमंत्रित करायचे आहे. तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणाले की, माझ्यासमोर हा प्रश्न आहे की एकीकडे जन्मस्थळ आणि दुसरीकडे कर्मस्थळ. पंतप्रधान मोदी म्हणाले की, यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या राजधानीत कर्मस्थळावर मी सभा घेण्याचे ठरवले आहे. मात्र पुढच्यावेळी जन्मस्थळावर नक्की येईल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी आपल्याला दिला, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
कधी-कधी इतिहास फार क्रूर असतो. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याकरता दुर्देवाने चित्रपटाची निर्मिती झाली आणि छावा चित्रपटानंतर आजच्या पिढीला देदीप्यमान इतिहास माहिती झाला. याआधीही माहिती होता पण जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आपण कुठेतरी अपयशी झालो होतो. आमच्या लक्षात आले की चित्रपट हे असे माध्यम आहे त्यामधून इतिहास सर्वांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे आपल्या मंत्रिमंडळाने असा निर्णय घेतला आहे की, अहिल्यामातांच्या (Punyashlok Ahilyadevi Holkar) जीवनावर बहुभाषिक चित्रपट आपण तयार करणार आहोत. सर्व भाषांमध्ये तयार करणारा आहोत, जेणेकरून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात अहिल्यामातांचे चरित्र, त्यांचे कर्तृत्व हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचले पाहिजे हा आपला प्रयत्न आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.