Bhiwandi : राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असताना अनेक आगीच्या (Fire) घटनेत वाढ झाली आहे. अशीच एक आगीची भीषण घटना भिवंडी तालुक्यातील राहणाल गावच्या (Rahnaal Village Fire Incident) हद्दीत घडली आहे. भिवंडीतील स्वागत कंपाउंड मधील फर्निचरच्या गोदामाला भीषण आग (Bhiwandi Furniture shop Caught Fire) लागली आहे. या आगीच्या कचाट्यात ७ ते ८ फर्निचरचे गोदाम आले असून लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. यात चार मजली इमारत कोसळल्याची माहिती समोर येत आहे. (Bhiwandi)
(हेही वाचा – Pahalgam Terror Attack नंतरही पाकच्या कुरापती थांबेना ! पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याने केला गळा चिरण्याचा इशारा)
मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण आगीच्या घटनेत फर्निचरची ७ ते ८ गोदाम जळून खाक झाली आहे. तसेच फर्निचरची पूर्ण इमारत आगीच्या भक्षस्थानी आल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, या आगीतील धूराचे लोळ पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरूनही दिसत आहेत. तसेच आगीच्या आसपास रहिवासी परिसर असल्याने सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन ते चार गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.
धुराचे काळे लोट, आग आटोक्यात आणणे कठीण
या घटनेची माहिती मिळताच भिवंडीतील दोन, तर कल्याण आणि ठाणे येथून प्रत्येकी एक अशा एकूण चार अग्निशामक गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र गोदामात असलेल्या ज्वलनशील पदार्थांमुळे आग आटोक्यात आणणे कठीण जात आहे.
(हेही वाचा – Fire : अंधेरीमध्ये निवासी इमारतीला आग; एकाचा मृत्यू, सहा जण रुग्णालयात दाखल)
चार मजली इमारत कोसळली
या दुर्घटनेत १२ गोदामे पूर्णपणे आगीत खाक झाली असून इमारतीचा बराचसा भाग कोसळून पडला आहे. या आगीच्या भीतीने नजीकच्या गोदामातील माल सुरक्षित बाहेर काढण्यासाठी कामगारांनी धावपळ सुरू झाली होती. तर शेजारी असलेल्या इमारती मधील सर्व कुटुंबीय आपल्याकडील मौल्यवान साहित्य घेऊन बाहेर सुरक्षितस्थळी पाठविण्यात आले होत. सुदैवाने आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. आग विझवण्याच्या प्रयत्नात हरिश्चंद्र वाघ या अग्निशमन दलाच्या (fire brigade) जवानाला किरकोळ जखमा झाल्या असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी अजूनही धुराचे लोट उठत असून अग्निशमन दलाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. दरम्यान, या भागात पाण्याची कमतरता जाणवत असल्याने आणि आग मोठ्या प्रमाणावर पसरल्याने तिला पूर्णपणे विझवण्यासाठी किमान १२ तासांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community