राजधानीत यमुनेच्या पुराचे थैमान; लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

154
राजधानीत यमुनेच्या पुराचे थैमान; लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर
राजधानीत यमुनेच्या पुराचे थैमान; लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

राजधानीत यमुना नदीने धोक्याच्या पातळी ओलांडली असून विविध भागात रस्त्यावर पुराचे पाणी साचले असून, घरांमध्येही पाणी शिरले आहे. यामुळे लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात येत आहे. तसेच कार्यालय आणि शाळा देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. दिल्लीत चार दिवसांपासून यमुना नदी धोक्याच्या पातळीवर आहे. शुक्रवारी सकाळी यमुना नदीची पाणीपातळी २०८.४८ मीटरवर पोहोचली आहे. हे धोक्याचे चिन्ह २०५ मीटरपेक्षा ३.४ मीटर जास्त आहे.

दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाबाहेरील रस्त्यावर पाणी साचले आहे. पूर यमुना बाजार, लाल किल्ला, राज घाट आणि ISBT-काश्मीरी गेटपर्यंत पोहोचला. येथे २० फुटांपर्यंत पाणी भरले होते. याशिवाय मजनू का टीला, निगम बोध घाट, मठ मार्केट, वजिराबाद, गीता कॉलनी आणि शाहदरा परिसराला सर्वाधिक फटका बसला आहे. सखल भाग रिकामा करण्यात आला आहे. परिस्थिती बिकट होत असल्याचे पाहून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ड्रेनेज दुरुस्त करण्यासाठी लष्कराची मदत घेतली.

(हेही वाचा – १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत दोन आठवड्यांत उत्तर द्या, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाचे निर्देश)

दिल्ली सरकारमधील मंत्री सौरभ भारद्वाज यांच्या म्हणण्यानुसार, आयटीओजवळील ड्रेनेज क्रमांक १२ चे रेग्युलेटर तुटल्याने पुराचे पाणी येत आहे. मुख्यमंत्री म्हणाले की रेग्युलेटर आज दुरुस्त केले जाईल. एनडीआरएफच्या १६ तुकड्या लोकांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आल्या आहेत. २,७०० मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. गुरुवारी यमुनेच्या आसपास २३ हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.