Environment Day : स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातील ‘मुंबई फळोत्सव २०२५’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

44

‘पंचमहाभूते’ आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) यांच्या वतीने आयोजित फळझाडं वितरण मोहिमेला पर्यावरणप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. (Environment Day) दादर (पश्चिम) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे १५ जून या दिवशी सकाळी हा फळ महोत्सव संपन्न झाला. या महोत्सवाअंतर्गत सोसायटी किंवा संस्था यांच्यासाठी प्रत्येकी ५ फळझाडांचे वाटप करण्यात आले. १३५ गृहसंकुलांना ही फळझाडे वाटण्यात आली.

(हेही वाचा – Iran – Israel War : इराणची नरमाईची भूमिका; चर्चा करण्यास, हल्ले थांबवण्याविषयी दिले संकेत)

वीर सावरकरांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर (Ranjit Savarkar) हे या फळोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे (Manjiri Marathe), भाजपा नेत्या आणि आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh), आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचीही या सोहळ्याला विशेष उपस्थिती होती. ‘पंचमहाभूते फाउंडेशन’चे अमित सावंत यांनी या सर्वांचे स्वागत केले. स्मारकातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला वंदन करून फळोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.

New Project 72

मान्यवरांचे बोल

विश्वयुद्धाच्या उंबरठ्यावर आपण आलो आहोत. पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण अत्यंत आवश्यक आहे, असे रणजीत सावरकर यांनी संबोधित केले आहे.

पर्यावरणाला अशा प्रकारे गांभीर्याने घेत आहेत, त्यासाठी धन्यवाद ! मंदिराला कसे स्वच्छ ठेवतो, तसेच आपण राष्ट्रही स्वच्छ ठेवले पाहिजे. लहान मुले, युवकांनीही याचे भान ठेवले पाहिजे. प्लॅस्टिकला नाकारून जीवन स्वीकारा, एवढेच मी या निमित्ताने सांगू शकतो, असे आवाहन समीर वानखेडे यांनी या प्रसंगी केले.

मुंबई फळोत्सवात फळझाडांचे वाटप करत आहोत. मुंबईत फळझाडे कमी झाली आहेत. आपल्या भावी पिढ्यांसाठी हे लाभदायक आहे, असे पंचमहाभूते या संस्थेचे अमित सावंत यांनी सांगितले.

पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पंचमहाभूते गेली काही वर्षे रोपांचे वितरण करत आहे. गेल्या वर्षी फुलझाडांचे वितरण करण्यात आले होते. त्यालाही चांगला प्रतिसाद लाभला होता.

निसर्गरक्षणासाठी कार्य करणारी संस्था पंचमहाभूते

मुंबईतील (Mumbai) झाडांची संख्या लक्षणीयरित्या कमी होत आहे. जागतिक तापमानवाढीचा परिणाम आताच इतक्या तीव्रतेने दिसून येत आहे, तर येणाऱ्या पिढ्यांना तो किती भोगावा लागू शकतो, याची कल्पनाही करू शकत नाही. त्यामुळेच मुंबईतील निसर्गाचे संगोपन व्हावे, यासाठी अमित सावंत यांची पंचमहाभूते (Panchamahabhute) ही संस्था वर्ष २०२१ पासून काम करत आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत विविध उपक्रम राबण्यात आले आहेत. नुकत्याच झालेल्या पर्यावरण दिनाच्या औचित्याने हे फळझाडे वितरण करण्यात येणार आहे. (Environment Day)

New Project 71

पंचमहाभूतांच्या संवर्धनासाठी कटिबद्ध – पंचमहाभूते फाउंडेशन

“पंचमहाभूते फाउंडेशन” ही एनजीओ या संपूर्ण चराचरात समाविष्ट असलेल्या जमीन, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांच्या जतन आणि संवर्धनासाठी कटिबद्ध आहे. वृक्ष लागवड, मिनी फॉरेस्ट, नेल फ्री ट्री, पर्क्युलेशन पिट्स, रेन वॉटर हार्वेस्टिंग यासोबतच “नो बाथ डे”, “टू मिनिट शॉवर”, “पर्यावरण विघ्नहर्ता” आणि “से नो टू प्लॅस्टिक वॉटर बॉटल” यासारख्या अभिनव कल्पना एनजीओ सातत्याने राबवत आहे. “सोल्युशन्स फॉर पॉल्युशन” हे ब्रीदवाक्य घेऊन जगभरातील पर्यावरणप्रेमी व्यक्ती आणि संस्था यांना या कार्यात सामावून घेण्यासाठी पंचमहाभूते विशेष प्रयत्नशील आहे. सर्वसामान्य जनतेला आपल्या उपक्रमामध्ये सक्रिय सहभागी करुन घेणे, हा फाउंडेशनचा आग्रह असतो. अत्यंत सोप्या पद्धतीने सामान्य नागरिकही सामाजिक कार्यात आपला सहभाग नोंदवू शकतील, असा फाऊंडेशनचा प्रयत्न असतो.

पंचमहाभूते फाउंडेशन लोकांची नाळ ओळखून समाजविधायक कामे हाती घेते आणि म्हणूनच अशा पर्यावरणविषयक कार्यक्रमांना जनतेचाही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांना अशा विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करुन दिल्यामुळे ते निसर्गाचे जतन, संरक्षण आणि संवर्धन यासाठीही कटिबद्ध होतील. समजून उमजून पर्यावरण संरक्षणासाठी योगदान देऊ करतील, असा पंचमहाभूते फाउंडेशनचा ठाम विश्वास आहे. (Environment Day)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.