कोरोना वाढतोय, शाळा सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

115

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून जनतेला पुन्हा एकदा मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पण आता कोरोनाच्या या वाढत्या संख्येमुळे आता जून महिन्यात सुरू होणा-या मुलांच्या शाळांचे काय, असा प्रश्न पालकांच्या मनात निर्माण होत आहे. याचबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. शाळा सुरु करण्याबाबत लवकरच एसओपी तयार करण्यात येणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

एसओपी तयार करणार

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा या ऑनलाईन पद्धतीने सुरू होत्या. 2022 मध्ये कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यामुळे प्रत्यक्ष शाळांना सुरुवात झाली होती. पण आता पुन्हा एकदा कोरोनाने राज्यात डोके वर काढल्यामुळे पालकांना मनात विद्यार्थ्यांच्या शाळांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पण याबाबत शालेय शिक्षणमंत्र्यांनी विधान केले आहे. शाळा सुरु करण्याबाबत एसओपी तयार करण्यात येणार असून, व्यवस्थित काळजी घेऊनच शाळा सुरू करण्यात येतील. तसेच विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ दिलं जाणार नाही, अशी माहितीही वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

शाळा सुरू करणं गरजेचं

राज्यातील कारोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने शिक्षण विभागाकडून आरोग्य विभागाचा सल्ला घेण्यात येणार आहे. त्यानुसारच एसओपी तयार करुन शाळा सुरू केल्या जातील. गेल्या दोन महिन्यांपासून विद्यार्थ्यांचं फार मोठं शैक्षणिक नुकसान झालं आहे. त्यामुळे शाळा सुरू करणं ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याची संपूर्ण काळजी शालेय शिक्षण विभाग आणि राज्य सरकारकडून घेण्यात येईल, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.