राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावताच आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) यंत्रणा अलर्ट मोडवर गेली आहे. एनडीआरएफ (NDRF) व एसडीआरएफच्या (SDRF) पथकांना युद्धपातळीवर तैनात करण्यात आले असून, मुंबई, पालघर, नागपूरसह विविध जिल्ह्यांत ही पथके मदत व बचाव कार्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.
राज्य आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई उपनगरात सर्वाधिक ३५.२ मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर मुंबई शहरात २९.८, ठाणे २९.५, नाशिक २६.३, आणि रायगडमध्ये २१.९ मिमी पावसाची नोंद झाली.
(हेही वाचा – Madhabi Puri Buch Clean Chit : सेबीच्या माजी अध्यक्ष माधवी पुरी-बूच यांना लोकपालची क्लिनचिट)
एनडीआरएफ आणि एसडीआरएफ तैनात: राज्यभरात सतर्क मोहीम
- मुंबई महानगरात एनडीआरएफच्या ३ पथका,
- पालघरमध्ये १ पथक,
- नागपूरमध्ये २ पथके तैनात,
- पुण्यात २ पथके राखीव,
- धुळे व नागपूर येथे एसडीआरएफची प्रत्येकी २ पथके तैनात.
या पथकांना अलर्ट ठेवण्यात आले असून, संभाव्य आपत्तींना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा सज्ज आहेत.
राज्यात २४ तासांत पावसाचा जोर; जीवित व प्राणहानी
पावसाच्या तडाख्यामुळे काही ठिकाणी दुर्दैवी घटनाही घडल्या आहेत:
- मुंबई शहरात झाड कोसळून २ मृत्यू
- पालघरमध्ये वीज पडून १ मृत्यू
- साताऱ्यात बंधाऱ्यात पडून १ व्यक्तीचा मृत्यू
- पुण्यात आगीच्या घटनेत ४ जखमी
- जालना जिल्ह्यात २६, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येकी १ प्राणी मृत
- मुंबईत अमोनिया गळती थांबवली
मुंबई काळाचौकी (Kalachowki) येथे भारत आइस कंपनीतून अमोनिया वायू गळती झाल्याचे समजताच मुंबई महापालिका (BMC) आणि अग्निशमन दलाने (Fire brigade) तातडीने हस्तक्षेप केला. गंभीर दुर्घटना टळली असून, परिस्थिती नियंत्रणात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचा – Olympic 2036 Bid : २०३६ च्या ऑलिम्पिक यजमानपदासाठी जर्मनीच्या बर्लिन शहराची अधिकृत दावेदारी )
राज्यात पावसाचा आकडेवारीनुसार जोर
जिल्हा पावसाचे प्रमाण (मिमी)
ठाणे – २९.५
रायगड – २१.९
नाशिक – २६.३
नागपूर – २०.८
धुळे – १५.९
रत्नागिरी – १०.१
सिंधुदुर्ग – १३
पुणे – ४.८
सातारा – ३.९
इतर जिल्हे ०.१ ते ५ मिमी दरम्यान
आपत्तींशी सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज
राज्य शासन आणि आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) विभागाने दिलासा दिला असून, कुठेही आपत्ती उद्भवली तरी तातडीने मदतीसाठी तैनात पथके उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पाऊस वाढत असून, पुढील काही दिवसांत हवामान आणखी बिघडू शकते नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी!
हेही पहा –
Join Our WhatsApp Community