ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर (Daji Panashikar) यांचे शुक्रवार, ६ जून या दिवशी संध्याकाळी ठाणे येथील त्यांच्या राहत्या घरी थे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन कन्या, जावई, मुलगा आणि सून असा परिवार आहे.
रामायण, महाभारताचे व्यासंगी, संतवाङ्मयाचे अभ्यासक असलेल्या दाजींनी (Daji Panashikar) 50 वर्षाहून अधिक काळ आपल्या व्याख्याने आणि साहित्यातून समाजाचे प्रबोधन केले. आजोबा वासुदेवशास्त्री पणशीकर यांचा हिंदू धर्मग्रंथ, परंपरा यांचा वारसा त्यांनी पुढे नेला. देशविदेशात त्यांनी सुमारे अडीच हजार व्याख्याने दिली. त्यांच्या पार्थिवावर शनिवार, ७ जून रोजी सकाळी ९.३० वाजता ठाणे पश्चिम येथील जवाहर बाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
दाजी पणशीकरांनी लिहिलेली पुस्तके
- अपरिचित रामायण
- श्रीसंत एकनाथकृत आठ ग्रंथ
- श्रीएकनाथमहाराजकृत भावार्थ रामायण (७ खंड )
- कथामृत (भाग १ ते ६ )
- कपटनीती
- कर्ण खरा कोण होता?
- महाभारत : एक सूडाचा प्रवास
Join Our WhatsApp Community