भारतामध्ये हवाई दलाला लागणाऱ्या सामुग्री निर्मितीसाठी कंपन्यांबरोबर करार केले जातात, त्याला वारेमाप प्रसिद्धीही दिली जाते; पण प्रत्यक्षात मात्र वर्षानुवर्षे सदर सामुग्री हवाई दलास पुरविलीच जात नाही, असे भारताच्या हवाईदल प्रमुखांनीच दिल्लीतील एका कार्यक्रमात स्पष्ट्पणे मांडले होते. यावर भाजपाने खुलासा करावा, अशी मागणी काँग्रेस (Congress) नेते अनंत गाडगीळ (Anant Gadgil) यांनी केली आहे.
(हेही वाचा – PM Narendra Modi हे ६ जूनला जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर; जागतील सर्वात मोठ्या पुलाचे करणार उद्घाटन)
अनंत गाडगीळ पुढे म्हणाले की, २०२१ साली एक सार्वजनिक उपक्रम व एक खासगी कंपनी सोबत लढाऊ विमान निर्मितीचा करार होऊनही गेल्या ४ वर्षांत एकही विमान हवाई दलाकडे सुपूर्द करण्यात आलेले नाही. ‘ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) दरम्यान राफेल विमान (Rafale Aircraft) पाडण्यात आले होते की नाही’, असा काँग्रेसतर्फे प्रश्न विचारला होता. त्या वेळी ‘पाकिस्तानची किती विमान पाडली, हे काँग्रेस का नाही विचारत ?’ असा उलट प्रश्न करत मूळ प्रश्नाला बगल दिली गेली होती. मोदी सरकारतर्फे अजूनही याबाबत अधिकृत उत्तर देण्यात आलेले नाही.
याउलट तिन्ही दलाचे प्रमुख अनिल चौहान (Anil Chauhan) यांनीच ही बाब आता मान्य केली. भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramaniam Swamy) यांनी तर ५ राफेल पाडली गेल्याचे विधान केले आहे. मग आता अनिल चौहान व स्वामी कुणाची भाषा बोलत आहेत, याचा भाजपा खुलासा करणार का ? असा प्रतिप्रश्नही या वेळी गाडगीळ यांनी केला. (Congress)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community