अहमदाबाद-लंडन विमान दुर्घटनेवर CM Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया; राज्य सरकार सर्वतोपरी मदतीसाठी सज्ज

208
CM Devendra Fadnavis : शाहिदी शताब्दी व गुरु-ता-गद्दी समागम आयोजनासाठी राज्य शासनाचे सहकार्य
  • प्रतिनिधी 

अहमदाबाद-लंडन आंतरराष्ट्रीय विमानाचा झालेला भीषण अपघात हृदय हेलावणारा असून, हा देशासाठी आणि हजारो कुटुंबियांसाठी अवर्णनीय शोकाचा प्रसंग असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींबद्दल तीव्र शोकसंवेदना व्यक्त करत, महाराष्ट्र सरकारकडून सर्व यंत्रणांना सज्जतेचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले, “या अपघातात अनेकांनी आपले घरचे कर्ते, प्रियजन गमावले आहेत. ही घटना काळाने घातलेली झडप आहे. या कठीण प्रसंगी महाराष्ट्राची संपूर्ण जनता दु:खात सहभागी असून, पीडितांना सावरण्याची शक्ती मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे.”

(हेही वाचा – Ahmedabad Plane Crash : एअर इंडियाच्या दुर्घटनेनंतर टाटा समूहाकडून पोस्ट; संवेदना व्यक्त करत अध्यक्ष म्हणाले…)

या भीषण दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने दखल घेतली असून, राहत व मदतकार्यासाठी केंद्र आणि गुजरात सरकार सक्रिय झाले आहे. त्यात महाराष्ट्र सरकारही पूर्ण पाठबळ देणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री (CM Devendra Fadnavis) पुढे म्हणाले, “जखमींना तातडीने दर्जेदार वैद्यकीय मदत मिळावी, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ते सर्व सहाय्य मिळावे, यासाठी महाराष्ट्रातील सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. गरज पडल्यास वाहतूक, आरोग्यसेवा, समुपदेशन आणि मदतनिधी अशा सर्व बाजूंनी मदत करण्यात येईल.” या दुर्घटनेने देशभरात हळहळ व्यक्त केली जात असून, या काळरात्रीतून सावरण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील राहील, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.