Chhatrapati Shivaji Maharaj : “छत्रपती शिवरायांचा इतिहास सीबीएससी अभ्यासक्रमात समाविष्ट करा”; खासदार रविंद्र वायकर यांची केंद्राकडे मागणी

शिवराज्याभिषेकाच्या ३५२ व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून विद्यार्थ्यांना नेतृत्व, देशभक्ती आणि स्वाभिमानाची शिकवण देणाऱ्या उपक्रमाची मागणी

96
Chhatrapati Shivaji Maharaj : "छत्रपती शिवरायांचा इतिहास सीबीएससी अभ्यासक्रमात समाविष्ट करा"; खासदार रविंद्र वायकर यांची केंद्राकडे मागणी
  • प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे अद्वितीय कार्य, हिंदवी स्वराज्याची स्थापना, कुशल युद्धनीती आणि धर्मनिरपेक्ष शासनपद्धती यांचा अभ्यास देशभरातील विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमातून व्हावा, यासाठी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे थेट पत्र पाठवून सीबीएससी अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.

“शिवचरित्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणं ही राष्ट्रसेवाच” – वायकर

छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्याभिषेक १६७४ मध्ये झाला. तो भारताच्या इतिहासातील सुवर्णक्षण मानला जातो. महाराज हे केवळ मराठा साम्राज्याचे संस्थापक नव्हते, तर दूरदृष्टी असलेले प्रशासक, निर्भीड योद्धा, आणि जनकल्याणवादी नेतृत्वाचं प्रतीक होते. “त्यांच्या जीवनातून नेतृत्व, देशभक्ती, सामाजिक एकता आणि आत्मनिर्भरतेचे मूल्य शिकता येते. अशा महामानवाचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करणे ही त्यांच्या स्मृतीला खरी आदरांजली ठरेल,” असे वायकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

(हेही वाचा – Sunil Gavaskar : ‘आयपीलच्या कामगिरीवर भरवसा ठेवण्यापेक्षा देशांतर्गत क्रिकेटची कामगिरी पाहा’ – सुनील गावस्कर गरजले)

विद्यार्थ्यांना मिळेल समृद्ध वारशाची ओळख

वायकर यांनी स्पष्ट केलं की, सीबीएससी अभ्यासक्रमात आधीही अनेक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचा समावेश करण्यात आला आहे. मग भारताच्या सांस्कृतिक अस्मितेचे मूर्तिमंत उदाहरण असलेले छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा इतिहास का नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या मते, “छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सीबीएससीच्या अभ्यासक्रमात आणल्यास, देशभरातील विद्यार्थी भारताचा समृद्ध इतिहास आणि विविधतेतील एकतेचे दर्शन अधिक सखोल पद्धतीने घेऊ शकतील.”

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून सकारात्मक पावले अपेक्षित

शिवराज्याभिषेकाच्या ३५२ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ही मागणी केल्याचे त्यांनी नमूद केले असून, आगामी शैक्षणिक वर्षातच या मागणीवर कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा वायकर यांनी व्यक्त केली आहे. हे केवळ इतिहास शिकवण्याचे नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या मनात आत्मगौरव, राष्ट्रभक्ती आणि सशक्त नेतृत्वाचे बीज पेरण्याचे कार्य ठरणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.