Chaudhry Anwarul Haq : पाकच्या नेत्याची भारताला धमकी; म्हणे, आम्ही मागे हटणार नाही

तुम्ही बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लोकांचे रक्त सांडले, तर तुम्हाला त्याची किंमत दिल्लीपासून काश्मीरपर्यंत चुकवावी लागेल, अशी दर्पोक्ती चौधरी अन्वरुल हक (Chaudhry Anwarul Haq) यांनी केली आहे.

94

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील (Pakistan) संबंध आणखी बिघडले आहेत. आता पाकिस्तानकडून वादग्रस्त विधाने दिली जात आहेत. पाकव्याप्त काश्मीर (POK) चे स्वयंघोषित पंतप्रधान चौधरी अन्वरुल हक (Chaudhry Anwarul Haq) यांनी एक भडकाऊ विधान केले आहे.

(हेही वाचा – Ganeshotsav 2025 : पर्यावरणपूरक मूर्ती साकारण्यासाठी मूर्तिकारांना प्रोत्साहन; मुंबई महापालिकेचा असाही पुढाकार)

बलुचिस्तानात घडलेल्या घटनांचा बदला

पाकव्याप्त काश्मीर (Pakistan-occupied Kashmir, POK) च्या पंतप्रधानांनीही भारताविरुद्ध एक भडकाऊ विधान केले आहे. त्यांनी या हल्ल्याचे समर्थन केले आणि म्हटले की, हा हल्ला बलुचिस्तानात (Balochistan) घडलेल्या घटनांचा बदला आहे. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, रक्त सांडावे लागले, तरी आम्ही मागे हटणार नाही. जर तुम्ही बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लोकांचे रक्त सांडले, तर तुम्हाला त्याची किंमत दिल्लीपासून काश्मीरपर्यंत चुकवावी लागेल.”

ते पुढे म्हणाले, “पीओकेचे सैनिक भूतकाळात अशा हल्ल्यांमध्ये सहभागी झाले आहेत आणि भविष्यात अधिक जोमाने सहभागी होतील. तुम्हाला जे करायचे आहे, ते करा, आम्ही मागे हटणार नाही. भारताच्या जलद कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.’

पाकची भारताशी संबंध तोडण्याची भाषा

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कठोर उपाययोजनांमुळे घाबरलेल्या पाकिस्तानने आता भारतासोबतचा व्यापार संपवण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची (एनएससी) बैठक बोलावली, जी सुमारे दोन तास चालली. या बैठकीत भारताच्या निर्णयांवर चर्चा झाली आणि त्यानंतर पाकिस्तानने भारताशी असलेले सर्व व्यापारी संबंध तोडण्याची घोषणा केली. पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्रही बंद केले आहे.

भारताने सिंधू पाणी करार (Indus Water Treaty) रद्द केल्याबद्दल पाकिस्तानने नाराजी व्यक्त केली आणि म्हटले की, पाणी अडवणे हे युद्धाचे कृत्य आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने भारताचे आरोप खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे. इस्लामाबादमधील भारतीय दूतावासात काम करणाऱ्या भारतीय लष्करी सल्लागारांना (लष्कर, नौदल आणि हवाई दल) ३० एप्रिलपर्यंत पाकिस्तान सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असा निर्णयही पाकिस्तानने घेतला आहे. (Chaudhry Anwarul Haq)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.