मध्य रेल्वेवरील (Central Railway Train Accident) मुंब्रा स्थानकाजवळ (9 जून) सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास मोठी रेल्वे दुर्घटना (mumbai local train accident) घडली. दोन लोकल गाड्या एकमेकांजवळून जाताना दरवाजावर लटकलेले प्रवासी एकमेकांना घासले गेले. यामुळे ८ प्रवाशी रेल्वे ट्रॅकवर पडले. या घटनेत आतापर्यंत 6 प्रवाशांचा मृ्त्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर जखमी प्रवाशांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेसंबंधी मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला (Central Railway PRO Swapnil Neela) यांनी या घटने संबंधी पत्रकार परिषद घेत. हे प्रवासी नेमके कसे पडले आणि नेमकं काय घडलं होतं, याविषयीची धक्कादायक माहिती दिली. तसेच सदर अपघात झाला तेव्हा सुरुवातीला पुष्पक एक्सप्रेसमधून (Pushpak Express) प्रवाशी खाली पडल्याची माहिती सांगण्यात येत होती. मात्र पुष्पक एक्सप्रेसचा काहीही संबंध नसल्याची माहिती मध्य रेल्वेचे (Central Railway) माहिती जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी सांगितले. (Mumbra Train Accident)
(हेही वाचा – Mumbai Train Accident : ८ प्रवाशांनी जीव गमावल्यानंतर रेल्वेने केल्या ‘या’ घोषणा)
मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी पत्रकार परिषद घेत. ही माहिती दिली की, “हे सर्व प्रवासी फूटबोर्डवर उभे होते आणि गर्दीत त्यांना एकमेकांचा धक्का लागला. त्यातून त्यांचा तोल ढासळल्याची माहीती मिळाली आहे. रेल्वे गार्डने या अपघाताची माहिती दिली. लोकलमधील आठ ते नऊ प्रवासी रेल्वे रुळावर पडले. सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली होती. त्यानंतर 9.50 च्या सुमारास घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचल्या होत्या. मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान ही घडली. फूटबोर्डवर उभ्या असलेल्या या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला आणि ते खाली पडले,” असं ते म्हणाले.
(हेही वाचा – Pakistan पुन्हा उघडा पडला; सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड करत, ‘हा’ दावा केला)
याविषयी ते पुढे म्हणाले, “एका जखमी प्रवाशाने माहिती दिली की तो फुटबोर्डवरून प्रवास करत होता. त्याच्या पाठीला त्याची बॅग लटकलेली होती. त्या बॅगेला अडकल्यामुळे ही घटना घडली. दोन्ही लोकल ट्रॅकमधील अंतर दीड ते दोन मीटरचं असतं. एक ट्रेन कसाऱ्याकडे जात होती. एक ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जात असताना हा अपघात झाला.”
अपघातानंतर रेल्वे बोर्डाचे महत्त्वपूर्ण निर्णय
“या अपघातानंतर रेल्वे बोर्डाने (Railway Board) निर्णय घेतलाय की नवीन गाड्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजरसह येतील. त्याच्यामध्ये 238 एसी लोकल मुंबई उपनगरीयवासीयांच्या सेवेत आणण्यात येणार आहेत. या गाड्यांना ऑटोमॅटिक डोअर फिटमेंट असेल. तिसरा निर्णय म्हणजे आयसीएफद्वारे आताच्या लोकल गाड्यांना रेट्रो फिटमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याची सिस्टिम लावण्याचा प्रयत्न करणार आहोत,” असं जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे”.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community