Central Government : वरूणराजाची चाहूल अन् ‘MSP’त घसघशीत वाढ; देशभरातील शेतकऱ्यांना केंद्राचा मोठा दिलासा

Central Government :   वरुणराजाच्या आगमनाआधीच केंद्र सरकार(Central Government)कडून शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने यंदाच्या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमती(एमएसपी)मध्ये वाढ करण्यास मान्यता दिली आहे. २०२५-२६ विपणन हंगामाकरिता खरीप पिकांच्या एमएसपीत वाढ होणार आहे.(Central Government)

52

Central Government :   वरुणराजाच्या आगमनाआधीच केंद्र सरकार(Central Government)कडून शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने यंदाच्या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमती(एमएसपी)मध्ये वाढ करण्यास मान्यता दिली आहे. २०२५-२६ विपणन हंगामाकरिता खरीप पिकांच्या एमएसपीत वाढ होणार आहे.(Central Government)

दरम्यान, केंद्र सरकार(Central Government)ने भातशेतीच्या किमान आधारभूत किंमतीत ६९ रुपयांची वाढ केली आहे. शेतकऱ्यांना उत्पादनासाठी किफायतशीर किंमत मिळावी या उद्देशाने सरकारने २०२५-२६ च्या खरीप हंगामासाठी मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सर्वाधिक वाढ केली आहे. यात कारळे (नायजरबियाणे) (प्रति क्विंटल ८२० रुपये), नाचणी (प्रति क्विंटल ५९६ रुपये), कापूस (प्रति क्विंटल ५८९ रुपये) आणि तीळ (प्रति क्विंटल ५७९ रुपये) करण्याची शिफारस केली आहे.

(हेही वाचा Karnataka Government : सर्वोच्च न्यायालयाचा काँग्रेस सरकारला दणका; मंदिर ताब्यात घेण्याचा प्रयत्न फेल )

डाळींसंदर्भात आधारभूत किंमतीत तूर डाळीसाठी ४५० रुपयांची वाढ करत प्रति क्विंटल ८ हजार रुपये तर उडीद डाळीची एमएसपी ४०० रुपयाने वाढून ७.८०० प्रति क्विंटल करण्यात आली आहे. मूगडाळीच्या एमएसपीत ८६ रुपयांची वाढ झाली असून प्रति क्विंटल ८,७६८ करण्यात आली आहे. तर दुसरीकडे, बाजरी (६३ टक्के) आणि त्यानंतर मका (५९ टक्के), तूर (५९ टक्के) आणि उडीद (५३ टक्के) या पिकांच्या बाबतीत शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा सर्वाधिक नफा मिळण्याचा अंदाज आहे. उर्वरित पिकांसाठी, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के जास्त नफा मिळण्याचा अंदाज आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एमएसपीसंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, एमएसपीसंदर्भात शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मागील १०-११ वर्षांच्या तुलनेत यंदा खरीप हंगामाकरिता मोठी एमएसपी वाढ केली आहे. एकूण २ लाख ०७ हजार कोटी रुपयांच्या २०२५-२६ च्या खरीप हंगामासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.(Central Government)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.