Caste Census : जातीय जनगणनेची कधी होणार सुरुवात? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या…

98
Caste Census : भारतातील बहुप्रतिक्षित जात जनगणनेची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. ही जनगणना दोन टप्प्यात (Caste census two phases) केली जाईल. पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होईल. या टप्प्यात देशातील चार राज्यांमध्ये जात जनगणना केली जाईल. जात जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात ज्या राज्यांचा समावेश करण्यात आला आहे त्यात उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, लडाख आणि जम्मू आणि काश्मीर यांचा समावेश आहे. (Caste Census)

(हेही वाचा – Operation Sindoor : पाकिस्तानला सातत्याने जशास तसे उत्तर देणे गरजेचे; लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनोद खंदारेंची स्पष्टोक्ती)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जनगणनेचा दुसरा टप्पा १ मार्च २०२७ पासून सुरू होईल. या टप्प्यात उर्वरित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा (Union Territories Caste Census) समावेश असेल. या जनगणनेची रूपरेषा सरकारने तयार केली आहे आणि संबंधित राज्यांमध्ये त्याची तयारी देखील सुरू झाली आहे.
 दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते
भारतात जनगणना ही एक नियमित प्रक्रिया आहे. जी दर १० वर्षांनी केली जाते. शेवटची जनगणना २०११ मध्ये झाली होती. नियमांनुसार, पुढील जनगणना २०२१ मध्ये होणार होती, परंतु कोविड-१९ (Covid-19) साथीच्या आजारामुळे ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली.

(हेही वाचा – Bangalore Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी; ११ जणांचा मृत्यू, २५ हून अधिक जखमी)

भारतातील शेवटची जातनिहाय जनगणना १९३१ मध्ये करण्यात आली होती. तेव्हापासून, कोणतीही व्यापक जातीनिहाय जनगणना झालेली नाही. अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) च्या लोकसंख्येचा डेटा नियमितपणे गोळा केला जात असला तरी, इतर मागासवर्गीय (OBC) च्या लोकसंख्येबाबत अचूक डेटा उपलब्ध नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.