मोरगाव रस्त्यावरील किर्लोस्कर कंपनीजवळील श्रीराम ढाब्यासमोर भरधाव वेगात आलेल्या कारने थांबलेल्या पिकअप टेम्पोला धडक देऊन शेजारीच उभा असलेल्या कारवर आदळली. हा अपघात (Accident) इतका भीषण होता की, जागेवरच आठ जणांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी, १८ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
सोमनाथ रामचंंद्र वायसे, रामु संजीवन यादव (दोघेही रा. नाझरे कप ता. पुरंदर), अजय कुमार चव्हाण (रा. उत्तरप्रदेश) अजित अशोक जाधव (रा. कांजळे, ता. भोर), किरण भारत राऊत (रा. पवारवाडी, ता. इंदापूर), अक्षय शंकर राऊत ( रा. झारगडवाडी, ता. इंदापूर) अश्विनी शंकर ऐसार (रा. नागनसूर हेद्रे, सोलापूर) अशी मृतांची नावे असून अन्य एकाची ओळख पटू शकली नाही. तर जखमींची नावेही रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाही. याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी सायंकाळी पुण्याहून माेरगावच्या दिशेने बुधवारी वेगाने जाणाऱ्या कारने जेजुरी येथील श्रीराम ढाब्या समोर साहित्य उतरवण्यासाठी थांबलेल्या पिकअप टेम्पोला जोराची धकड (Accident) दिली.
ही धडक इतकी जोरात होती की, ही कार टेम्पोच्या बाजूला असणाऱ्या कार वर आदळली. या भीषण अपघातात (Accident) टेम्पोमधील वस्तू खाली करणारे दोघेजण, श्रीराम ढाब्यासमोर उभे असणारे तिघे तर कारमधील तिघे जण जागेवरच ठार झाले. तर दोन मुले, एक महिला, दोन पुरुष असे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community