-
प्रतिनिधी
राज्यातील एसटी महामंडळातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक घोषणा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. येत्या जून २०२५ पासून कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर ५३ टक्के महागाई भत्ता देण्यात येणार आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. यासोबतच १ कोटी रुपयांचे अपघाती विमा कवच, तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना संपूर्ण वर्षासाठी मोफत प्रवास पास देण्याचेही आश्वासन त्यांनी दिले. (Cabinet Decision)
सह्याद्री अतिथीगृहात आयोजित एसटी महामंडळाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. बैठकीस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सदाभाऊ खोत, माजी खासदार आनंदराव अडसूळ, तसेच वरिष्ठ अधिकारी व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “एसटी ही सामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे तिची सेवा दर्जेदार, स्वच्छ आणि सुलभ असली पाहिजे. फक्त बसच नव्हे तर बसस्थानकांनाही ‘बस पोर्ट’च्या दर्जापर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करावेत.” त्यांनी कार्गो सेवा सुरू करण्यावरही भर देत एसटीच्या तोट्यातून बाहेर येण्यासाठी सर्वतोपरी उपाय योजण्याचे निर्देश दिले. (Cabinet Decision)
(हेही वाचा – Mumbai Rain : आयुक्तांनी पावसाळ्यात तुंबणाऱ्या ‘त्या’ ठिकाणांची केली पाहणी; अधिकाऱ्यांना दिले हे आदेश)
वैद्यकीय सुविधा आणि विमा योजना
कर्मचाऱ्यांसाठी ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ किंवा ‘धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना’ यापैकी एक निवडण्याचा पर्याय देण्यात आला आहे. यामध्ये ५ लाखांपर्यंत कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध असेल. याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत वेतन खाते असलेल्या कर्मचाऱ्यांना १ कोटी रुपयांपर्यंतचा अपघाती विमा कवच देण्यात येणार आहे. पूर्णतः अपंगत्वासाठी १ कोटी, अंशतः अपंगत्वासाठी ८० लाख रुपयांपर्यंत विमा रक्कम देण्यात येईल. (Cabinet Decision)
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी खास सुविधा
सुमारे ३५,००० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या पत्नीला आता वर्षभरासाठी मोफत प्रवास पास मिळणार आहे. यापूर्वी हा पास केवळ ९ महिन्यांसाठी होता, तो आता १२ महिन्यांसाठी वाढवण्यात आला आहे. (Cabinet Decision)
(हेही वाचा – महापालिका निवडणुकीची Shiv Sena कडून जोरदार तयारी! ‘जनता दरबार’ मोहिमेची रणनीती)
थकबाकीबाबत लवकर निर्णय
महागाई भत्त्याच्या थकबाकीबाबतही चर्चा झाली असून, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी “निधीची उपलब्धता पाहून यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल,” असे आश्वासन दिले. या निर्णयामुळे राज्यातील एसटी महामंडळातील हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असून, त्यांच्या हिताच्या दृष्टीने सरकार ठोस पावले उचलत असल्याचे आजच्या घोषणांवरून स्पष्ट झाले आहे. (Cabinet Decision)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community