-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील नदी आणि नाल्यांमध्ये पावसाळ्यात आसपासचा कचरा वाहून पुन्हा नाल्यांमध्ये जात असल्याने हा सर्व कचरा आणि राडारोडा उचलण्याची मोहिम आता महापालिकेच्यावतीने (BMC) हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून नदी, नाल्यांच्या परिसरातील स्वच्छतेवर या मोहिमेद्वारे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. रस्ते, गल्ली – बोळ यांची स्वच्छता, पेव्हर ब्लॉक, कडेचे दगड (कर्बस्टोन), नाले व पर्जन्य जलवाहिनीच्या इनलेट पॉईंट्सवरील जाळ्यांची स्वच्छता करण्यात येईल. जेणेकरुन पावसाळी पाण्याच्या प्रवाहामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार आणि प्रवासह सुरळीत राखला जाईल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. (BMC)
मुंबईतील पावसाळासंदर्भातील कामकाजाच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या (BMC) घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने मुंबई शहर आणि उपनगरात २९ मे ते १५ जून २०२५ दरम्यान टाकाऊ साहित्य संकलनासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासोबतच, मोहिमेत दररोज सकाळी १० वाजण्यापूर्वी स्वच्छता तसेच गरजेनुसार दुसऱ्यांदा झाडलोट अर्थात स्वच्छता (सेकंड स्विपिंग) करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने विविध उपाययोजनांसोबतच निरनिराळे उपक्रमही राबविले जात आहेत. (BMC)
(हेही वाचा – मुंबईला 1 लाख कोटींचा पुर? Ashish Shelar यांचा ठाकरे परिवारावर घणाघात; श्वेतपत्रिकेची मागणी)
पावसाळ्याच्या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरातील विविध भागांत स्वच्छता अबाधित राहावी, या उद्देशाने नियमित स्वच्छतेसोबत विशेष पुढाकार घेण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर, पावसाळ्यात नियमित अंतराने कचरा गोळा व स्वच्छता करून स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. विशेषतः सार्वजनिक ठिकाणांवर टाकून देण्यात आलेल्या वस्तू, साहित्य यांचे संकलन करण्यावर भर देण्यात येणार आहे. जेणेकरुन पावसाच्या पाण्यासोबत वाहून येणाऱ्या या टाकाऊ वस्तुंमुळे पाणी निचरा करताना अडथळा होऊ नये, हा या मागील प्रमुख उद्देश आहे. टाकाऊ वस्तुंप्रमाणेच रस्ते व पदपथांच्या कडेला पडून असणारे दगड (कर्बस्टोन), पेव्हर ब्लॉक, प्रकल्प स्थळांवरील राडारोडा, इतर राहिलेले साहित्य हे गोळा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. नदी, नाल्यांच्या परिसरातील स्वच्छतेवर या मोहिमेत विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे, जेणेकरुन पावसाळी पाण्याच्या वहनामध्ये उद्भवणारे संभाव्य अडथळे दूर करता येतील. (BMC)
या अंतर्गत, गुरुवारी २९ मे ते १५ जून २०२५ दरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सर्व प्रशासकीय विभाग (वॉर्ड) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सर्वाधिक कचरा जमा होणारी ठिकाणे शोधून त्याठिकाणी सखोल स्वच्छता केली जाईल. पादचारी मार्ग, रस्त्यावरील कचरा, टाकाऊ सामग्री, राडारोडा, बेवारस साहित्य हटवण्यासाठी आवश्यकतेनुसार यंत्रसामग्रीचा वापर करून कचऱ्याचे संकलन करण्यात येईल. यासोबतच, नाल्यांलगतच्या भूखंडांवरून आणि प्रकल्पांच्या ठिकाणी शिल्लक राहिलेला राडारोडा तसेच कचरा उचलून स्वच्छता करण्यात येईल. मालकी हक्क काहीही असला तरी सर्व भूखंडांवरून (राडारोडा वगळून) कचरा गोळा करण्यात येईल. दरम्यान, घरे, गृहनिर्माण संस्था तसेच अन्य आस्थापनांच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी आपापल्या परिसरात स्वच्छता ठेवावी. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा, राडारोडा टाकू नये आणि स्वच्छतेसंदर्भातील प्रशासनाच्या प्रयत्नांत सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community