-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेबाबत राज्याच्या नगरविकास खात्याने संबंधित महापालिकांना आदेश जारी करत सार्वत्रिक निवडणूक तात्काळ घेणे आवश्य असल्याने यासंदर्भातील प्रभाग रचना करण्याबाबत परिपत्रक जारी केले आहे. या संदर्भात मुंबई महानगरपालिकेलाही प्रभाग पुनर्रचना करण्याचे निर्देश प्राप्त झाले आहे. त्यानुसार प्रभाग रचनेचा प्रारुप तयार करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार प्रभाग रचनेचा प्रारुप बनवताना अत्यंत गोपनीय बनवले जावे. प्रभाग रचनेची माहिती ही सर्वसामान्य नागरिकांना प्रारुप प्रसिद्धीच्या वेळी प्रथम कळते, पण त्यापूर्वी राजकीय व्यक्ती, प्रसिद्धी माध्यमे अथवा अन्य व्यक्तींना याची माहिती देता येणार नाही तसेच प्रभाग रचनेच्या कामांमध्ये असणाऱ्या संबंधितांवर दबाव टाकता येईल. जर तसे झाल्यास संबंधितांविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. (BMC)
मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात प्राप्त झालेल्या प्रचाग रचना २०२५ च्या संदर्भातील सर्व अधिकारी महापालिका आयुक्तांना प्रदान करण्यात आली आहे. निवडणुकीकरता प्रभाग रचना ही शासनाने राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने करावयाची आहे असे नमुद केले आहे. मुंबईतील २२७ प्रभागांची प्रारुप प्रभाग रचना तयार करून राज्य निवडणूक आयोगाची मान्यता महापालिका आयुक्त घेतील आणि या प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयुक्त हे मान्यता देतील. (BMC)
(हेही वाचा – BMC : आपल्या घराजवळील रस्त्यावर खड्डा पडलाय? तर इथे करा तक्रार)
प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध केल्यानंतर यावरील आधारीत प्राप्त हरकती व सूचनांवर राज्य शासनाने नेमलेले अधिकारी हे सुनावणी घेतील. या प्रारुप प्रभाग रचनेच्या सुनावणीनंतर अंतिम केलेल्या प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर केला जाईल आणि त्यानंतर राज्य निवडणूक आयुक्तांनी या अंतिम प्रभाग रचनेला मान्यता दिल्यानंतर महापालिका आयुक्त हे अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करतील असे नमुद केले आहे. (BMC)
सन २०११ च्या जनगणनेनुसार मुंबई महापालिका हद्दीतील प्रगणक एकूण लोकसंख्या, अनुसूचित जातीची आणि जमातीची लोकसंख्या, प्रगणक गटाचे नकाशे आणि घरयादी ही जनगणना कार्यालयाकडून उपलब्ध करून केली जाणार आहे. पण प्रभागातील मतदार संख्या अथवा सध्याची रहिवाशांची संख्या विचारात घेता येणार नसून याचा प्रभाग रचनेशी कसलाही संबंध नसेल असेही नमुद केले आहे. प्रभागाची लोकसंख्या ही त्या प्रभागाच्या सरासरी लोकसंख्येच्या १० टक्के जास्त किंवा १० टक्के कमी अशाप्रकारे मर्यादीत ठेवत रचना करता येणार आहे. (BMC)
(हेही वाचा – Baba siddique Murder Case : हत्येच्या कटातील मुख्य आरोपी झिशान अख्तरला कॅनडात अटक; भारतात आणण्याच्या हालचालीला वेग)
प्रभागाच्या सीमारेषा, मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते, रेल्वे रुळ, उड्डाणपूल इत्यादी नैसर्गिक मर्यादा विचारात घेवून निश्चित करावी. पण कोणत्याही परिस्थितीत एका इमारतीचे, चाळीचे, घराचे विभाजन दोन प्रभागांमध्ये होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही आदेशात म्हटले आहे. मोकळ्या जागांसह सर्व जागा कोणत्या ना कोणत्या प्रभागात आल्याच पाहिजेत. प्रभाग रचनेच्या बाबतीत कोणासही शंका घेण्यास वाव राहणार नाही याचीही दक्षता घ्यावी. शिवाय रस्ते, रेल्वे, नाले, नद्या, सिटी सर्वे क्रमांक यांचा उल्लेख केला जावा असेही नमुद केले आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community