BMC : महापालिकेच्या उद्यानातच निर्माण होतात डासांचे अड्डे; प्रशासनाचे दुर्लक्ष

748
BMC : महापालिकेच्या उद्यानातच निर्माण होतात डासांचे अड्डे; प्रशासनाचे दुर्लक्ष
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

डेंग्यू, मलेरियाच्या आजारांना निमंत्रण देणाऱ्या डासांचे अड्डे नष्ट करण्याचा प्रयत्न महापालिका कीटकनाशक विभागाकडून सुरु असतो. तसेच अशाप्रकारचे अड्डे नष्ट न केल्यास महापालिकेच्यावतीने कारवाई केली जाते. परंतु, लोकांसांग बह्मज्ञान आणि स्वत: कोरडे पाषाण अशाप्रकारची स्थिती महापालिका प्रशासनाची आहे. माटुंगा पश्चिम येथील गोपी टँक रोडवरील संत तुकाराम उद्यानातील एलईडी बेंचमध्ये पाणी साचून त्यामध्ये अळ्या तयार झाल्या आहेत, परंतु या अळ्यांमुळे मलेरिया तथा डेंग्यूचा आजार पसरवणाऱ्या या डासांची उत्पादने खुद्द महापालिकेच्या उद्यानांमध्ये तयार होत असून यामुळे ही ठिकाणे नष्ट करण्याऐवजी या आजारांचा फैलाव व्हावा अशीच इच्छा महापालिका प्रशासनाची दिसून येत आहे. (BMC)

(हेही वाचा – Terrorism : दहशतवादाला सीमा नाही, सर्व देशांनी एकत्रित लढा देण्याची गरज; लायबेरिया प्रजासत्ताकच्या संसदेत भारताची परखड भूमिका)

माटुंगा पश्चिम येथील सिटीलाईट सिनेमाच्या मागील बाजूस असलेल्या गोपी टँक रोडवरील संत तुकाराम उद्यानात तत्कालिन मुंबई महापालिका सभागृहनेत्या विशाखा राऊत यांच्या प्रयत्नाने विशेष निधी अंतर्गत प्रकाशमान असणारी बसण्याची आसने अर्थात एलईडी बेंचेस बसवण्यात आली आहेत. या एलईडी बेंचेसचे काही भाग तुटून त्यात पावसाचे पाणी जमा होऊ लागले आहे. या जमा झालेल्या पावसाच्या पाण्यामध्ये आता डासांच्या अळ्या तयार झाल्या असून या डासांच्या अळ्या मलेरिया आणि डेंग्यूच्या आजारांना निमंत्रण देण्यास कारणीभूत ठरत आहे. (BMC)

(हेही वाचा – Cabinet Decision : छत्रपती संभाजीनगरात १५ एकरावर ईएसआयसी रुग्णालय; आणखी ९ ठिकाणी प्रस्तावित केंद्रांना मंजुरी)

महापालिकेच्या कीटकनाशक विभागाच्यावतीने नागरिकांना आवाहन करून घरांमध्ये साठवून ठेवलेले पाणी बदला, फेंगशुईच्या झाडांसाठी असलेले पाणी बदलले जावे, उघड्यावर नारळाची करवंटी, तसेच बॉटल्स आणि झाकणांमध्ये पाणी साचल्यास ते पाणी काढून टाकावे आणि वस्तूची विल्हेवाट लावली जावी. एसी डकमधील पाणी असेल किंवा अन्य ठिकाणी पाणी असेल तर ते नष्ट करावे अशाप्रकारचे आवाहन केले जाते. परंतु, नागरिकांना आवाहन करताना महापालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांचे तसेच तेथील माळ्याचे यावर लक्षच नसल्याने या उद्यानात एलईडी बेंचेसमध्ये पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे डासांच्या अळ्या तयार झाल्याने आसपासच्या वस्त्यांमध्ये भविष्यात डासांचा प्रादुर्भाव वाढून डेंगी, मलेरिया सारख्या आजारांचा प्रसार होण्याची शक्यता नाकारली जात नाही. त्यामुळे महापालिका प्रशासन आपल्याच जागेत तयार होणाऱ्या डसांचे अड्डे कधी नष्ट करणार असा प्रश्न केला जात आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.