
-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील रस्ते आणि पदपथ वाहतुकीसाठी आणि चालण्यासाठी असून यावर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाढत्या अतिक्रमणांमुळे होणाऱ्या त्रासाची दखल आता महापालिकेने घ्यायला सुरुवात केली आहे. त्यानुसार महापालिकेच्या जी उत्तर विभागाच्या प्रभादेवी येथील सयानी रोड आणि काकासाहेब गाडगीळ मार्ग हे अतिक्रमण मुक्त करण्यात आले आहेत. या दोन्ही रस्त्यावरील पदपथांवर असलेली अडगळ आणि अनधिकृत बांधकामे महापालिकेच्यावतीने हटवण्यात आली तसेच कचरा साफ करून स्वच्छ करण्यात आला. (BMC)
मुंबई महापालिकेच्यावतीने पदपथ आणि रस्त्यावरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात असून नागरिकांना सुरळीत चालता यावे यासाठी प्रशासनाच्यावतीने धडक पाऊल उचलले आहे. त्यादृष्टीकोनातून महापालिकेच्या जी उत्तर विभागाच्यावतीने अतिक्रमणांवरील धडक कारवाई सुरु आहे. दादर पश्चिममधील फेरीवाला मुक्त रस्ते आणि पदपथ करण्यात यश मिळाल्यानंतर आता जी उत्तर विभागाने दादर पश्चिम येथील काकासाहेब गाडगीळ मार्ग आणि रहिमतुल्ला सयानी मार्गावरील अडवून ठेवलेले पदपथ आणि रस्ते अडथळा मुक्त तसेच स्वच्छ राखण्याच्या दृष्टीकोनातून कारवाई केली. यावेळी पदपथावरील बाकडे, शेडूस, त्यांचे स्टॉल्सवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच पदपथ आणि रस्त्यावरील वाहने हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला. (BMC)
(हेही वाचा – BMC : प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षणिक तपासणीसाठी सज्ज ठेवण्याचे महापालिका अतिरिक्त आयुक्तांचे आवाहन)
महापालिकेच्या जी उत्तर विभाग आणि जी दक्षिण विभागाच्यावतीने सयानी मार्गावरील संयुक्तपणे कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये दोन्ही विभागांमधील सहायक अभियंता (परिरक्षण विभाग), सहायक अभियंता (घनकचरा व्यवस्थापन विभाग) वैद्यकीय विभागाचे अधिकारी आदींसह २ जेसीबी, ५० कामगार यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली. यामध्ये दादर पोलिस ठाणे आणि वाहतूक पोलिसही उपस्थित होते. या कारवाईमध्ये दोन्ही रस्त्यांवरील पदपथांवरील अतिक्रमित बांधकामे, ठेवलेले लाकडी बॉक, इतर प्लास्टिक बॉक्स तसेच इतर साहित्य जप्त करून हटवण्यात आले आहे. तसेच रस्त्यावरील साहित्यही जप्त करण्यात आले आहे. (BMC)
याबाबत जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते यांच्याशी संपर्क साधला त्यांनी, रस्ते आणि पदपथ योग्य पद्धतीत राखण्यासाठी आणि स्वच्छ करण्यासाठी तसेच भूभाग हे अतिक्रमण मुक्त असणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळेला अशाठिकाणी बरेचसे फेरीवाले अनधिकृत स्टॉल्स आणि वाहने यांनी हा भूभाग अडवल्याने तिथे रस्ता स्वच्छता किंवा पदपथ चालण्यासाठीची गैरसोय होत असते. त्यामुळे महापालिकेच्यावतीने वर्दळीची ठिकाणे, जास्त वाहनांची वाहतूक असेल, नागरिकांची वर्दळ असेल अशी ठिकाणी अधोरेखित करून अशाप्रकारे अशी अतिक्रमित भूभाग मोकळे करून हे नागरिकांना व वाहनांना चालण्यासाठी आणि वाहतुकीसाठी खुले करण्याचा प्रयत्न राहिल आणि अशाप्रकारे असलेल्या अतिक्रमण निर्मुलनाची कारवाई यापुढेही कायमच राहिले, असे स्पष्ट केले. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community