बीडीडी चाळीतील रहिवाशांना श्रावणाआधी नव्या घराची चावी मिळणार; मंत्री Ashish Shelar यांची घोषणा

143
बीडीडी चाळीतील रहिवाशांना श्रावणाआधी नव्या घराची चावी मिळणार; मंत्री Ashish Shelar यांची घोषणा
बीडीडी चाळीतील रहिवाशांना श्रावणाआधी नव्या घराची चावी मिळणार; मंत्री Ashish Shelar यांची घोषणा

मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात एक महत्त्वाचा टप्पा लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. बीडीडी चाळीतील (BDD Chawl) रहिवाशांना नव्या घरांच्या चाव्या येत्या श्रावण महिन्याआधीच देण्यात येणार असल्याचे स्पष्ट आश्वासन मुंबई उपनगरचे पालकमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिले आहे.

म्हाडाच्या मुंबई बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरिकर (Milind Borikar) यांनी देखील ही माहिती अधिकृतरीत्या दिली. आज मंत्री शेलार यांनी वरळी बीडीडी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील नव्या टॉवरची पाहणी केली आणि रहिवाशांच्या अडचणी व मागण्यांची प्रत्यक्ष दखल घेतली.

(हेही वाचा – पाकिस्तानमध्ये लागले पोस्टर्स; लष्करप्रमुख Asim Munir यांचा खरा चेहरा उघड)

“पाणी, गॅस, पार्किंगसह सर्व सुविधा देण्याचे स्पष्ट आदेश”

रहिवाशांनी नव्या इमारतींमध्ये पुरेशा पाण्याच्या पुरवठ्याची मागणी केली. त्यावर प्रतिक्रिया देताना मंत्री शेलार यांनी म्हाडा (MHADA) आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांना “नवीन पाण्याच्या लाईन टाकून प्रत्येक घरात पाणी पोहोचवावे” असे स्पष्ट आदेश दिले. पाईप गॅस आणि इतर मूलभूत सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जातील, असे बोरिकर यांनी सांगितले.

तात्पुरत्या पार्किंगसाठी जुन्या इमारतींचा वापर; लॉटरी पद्धतीने पार्किंग वाटप

पार्किंगच्या प्रश्नावर समाधानकारक तोडगा काढताना अ‍ॅड. शेलार यांनी म्हाडाला (MHADA) निर्देश दिले की, शेजारील दोन जुनी इमारती पाडून तात्पुरते पार्किंग उपलब्ध करून द्यावे. म्हाडानेही या सूचनेला मान्यता दिली असून पार्किंग लॉटरी पद्धतीने दिले जाईल, असे बोरिकर यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – भारतीय सैन्याने पाकिस्तानविरोधी केलेल्या सैन्य कारवाया Congressला का खुपतात? Shashi Tharoor यांनी सैन्याचे कौतुक केल्याने पक्षाकडून होतेय टीका)

श्रावणात घर मिळणार, नवजीवनाचा शुभारंभ!

रहिवाशांनी लवकरात लवकर चाव्या मिळाव्यात अशी जोरदार मागणी केली होती. त्यावर बोरिकर यांनी “येत्या श्रावणाच्या आत सर्व रहिवाशांना नव्या घरांच्या चाव्या वितरित केल्या जातील” असे जाहीर केले.पुनर्विकासाची वाट पाहणाऱ्या बीडीडी चाळीतील (BDD Chawl) हजारो कुटुंबांसाठी ही बातमी नवजीवनाची नांदी ठरणार आहे.

प्रत्यक्ष संवादातून निर्णय, रहिवाशांच्या आशा उंचावल्या

सुमारे दोन तास मंत्री शेलार (Ashish Shelar) यांनी रहिवाशांशी थेट संवाद साधून त्यांच्या प्रत्येक शंकेला उत्तर दिले. त्यांच्या आश्वासनांमुळे रहिवाशांमध्ये समाधानाचे व आशावादाचे वातावरण निर्माण झाले आहे.

“बीडीडी चाळ पुनर्विकास केवळ बांधकाम नव्हे, तर हजारो कुटुंबांच्या नव्या स्वप्नांची उभारणी आहे. आमचा प्रयत्न आहे की प्रत्येक रहिवासी आपल्या नव्या घरात अभिमानाने, समाधानाने आणि सुरक्षिततेने राहावा,”

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.