फेब्रुवारी 2025 मध्ये मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यांमध्ये वाढ करण्यात आली होती. नवीन दरांनुसार भाडे आकारणीसाठी मीटरमध्ये आवश्यक ते बदल म्हणजेच रिकॅलिब्रेशन करणे बंधनकारक आहे. सध्या मुंबईतील सुमारे 70 टक्के रिक्षा व टॅक्सींचे मीटर रिकॅलिब्रेशन पूर्ण झाले आहे. उर्वरित 30 टक्के वाहनचालकांसाठी 31 मे ही अंतिम मुदत ठरवण्यात आली आहे. या मुदतीनंतर, 1 जूनपासून रिकॅलिब्रेशन न केलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. (Auto-Taxi)
(हेही वाचा – Bihar-Nepal Border वर ‘नो मॅन्स लँड’चे व्हिडीओ काढताना दोन चिनी तरुणांना अटक)
रिक्षा आणि टॅक्सीच्या पूर्ण करण्यासाठी ३१ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत संपण्यासाठी आता केवळ दोन दिवस राहिले असून प्रादेशिक परिवहन विभागाअंतर्गत आरटीओच्या (RTO) नोंदीनुसार अजून १०,३६४ टॅक्सी आणि ५०,९१४ रिक्षांचे मीटर रिकॅलिब्रेशन अद्याप शिल्लक आहे. परिणामी उर्वरित रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी पुन्हा मुदतवाढ मिळणार की कारवाई होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
(हेही वाचा – Donald Trump यांच्या ‘टॅरिफ वॉर’ला अमेरिकन कोर्टाकडून स्थगिती !)
दोनवेळा मुदतवाढ मिळूनही अद्याप हजारो रिक्षा-टॅक्सी चालकांनी मीटर रिकॅलिब्रेशन प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. या काळात रिक्षा-टॅक्सी चालकांकडून मनमानी भाडेवसुली सुरूच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आरटीओने संबंधित रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कारवाई करून प्रवाशांची लूट थांबवावी, अशी मागणी केली जात आहे.
२८ मेपर्यंतचे शिल्लक मीटर रिकॅलिब्रेशन
अंधेरी आरटीओ
रिक्षा – १८,१११ टॅक्सी – ८५७
बोरिवली आरटीओ
रिक्षा – १३,४६६ टॅक्सी – १६४२
वडाळा आरटीओ :
रिक्षा – १९,३३७ टॅक्सी – २९६५
ताडदेव आरटीओ :
टॅक्सी – ४९००
(हेही वाचा – India’s Tour of England : कर्णधार शुभमन गिल दुसऱ्या सराव सामन्याला मुकणार)
रिकॅलिब्रेशन अंतिम टप्यात आहे. ३१ मेपर्यंत मीटर रिकॅलिब्रेशन प्रक्रिया सुरू राहणार असून, त्यानंतर शिल्लक रिक्षा, टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती परिवहन आयुक्त, प्रभारी अप्पर भरत कळसकर (Bharat Kalaskar) यांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community