
-
प्रतिनिधी
“छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांसारख्या उपभोगशून्य, लोककल्याणकारी राज्यकारभार करणाऱ्या महापुरुषांचा इतिहास स्वातंत्र्यानंतरच्या राज्यकर्त्यांनी जनतेसमोर आणलाच नाही,” असा घणाघात सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त सांस्कृतिक विभागातर्फे रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रंगभूमीवर गीत-संगीत, पोवाडा आणि शायरीच्या माध्यमातून अहिल्याबाईंच्या जीवनपटाचे प्रभावी दर्शन घडवण्यात आले. कार्यक्रमास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार संजय उपाध्याय, माजी आमदार भाई गिरकर, सुनील राणे, तसेच सांस्कृतिक विभागाचे संचालक विभीषण चवरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
(हेही वाचा – BJP District President : भाजपाकडून राज्यातील उर्वरित जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर)
“अहिल्याबाईंच्या सनदीचे रोज वाचन करून ती मस्तकी लावावी इतकी ती पवित्र आहे,” असे सांगताना शेलार (Ashish Shelar) म्हणाले, “त्यांचे राज्यकारभार हे समतेचे, नारी सन्मानाचे आणि जबाबदारीचे प्रतीक होते. ‘मला प्रत्येक गोष्टीचा हिशेब भगवंताला द्यायचा आहे’ या त्यांच्या विचारांतून त्यांच्या कार्याची खोली लक्षात येते. आज जगभर ज्या गोष्टींवर चर्चा होते – समानता, महिला हक्क – यांचे मूळ अहिल्याबाईंच्या विचारांत आणि कार्यात आहे.” दरम्यान, मुंबई भाजपातर्फे संपूर्ण शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ईशान्य मुंबई जिल्ह्याच्यावतीने भव्य शोभायात्रा, खार येथे महाआरती, तर दहिसर येथे शोभायात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
मुंबई भाजपा अध्यक्ष अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) हे स्वतः या सर्व कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते. यासोबतच आमदार मिहीर कोटेचा, संजय उपाध्याय, मनिषा चौधरी, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष दीपक दळवी, तसेच उत्तर मुंबईचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनीही सहभाग नोंदवला. हा कार्यक्रम केवळ अहिल्याबाईंच्या गौरवशाली कार्याचे स्मरण नव्हते, तर समाजाला दिशादर्शक ठरणाऱ्या विचारांचे नव्याने स्मरण देणारा ठरला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community