Ashadi Wari 2025 : राज्य शासनाकडून निर्णय जारी; पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, वाचा…

103
पंढरपूरला वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. वारकऱ्यांच्या वाहनांना राज्य सरकारने पूर्ण टोल माफ (warkari toll exemption) करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. 18 जून ते 10 जुलै दरम्यान वारकऱ्यांना ही टोलमाफी दिली जाणार आहे. यामध्ये 10 मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गांवर टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. (Ashadi Wari 2025)

(हेही वाचा – ‘लाज वाटली पाहिजे!’ म्हणत Bombay High Court राज्य सरकारवर संतापलं; नेमकं काय प्रकरण ? वाचा…)

काय आहे शासन निर्णय?
पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना टोल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 18 जून ते 10 जुलैदरम्यान पालखी मार्गावर वारकऱ्यांना टोलमाफी मिळणार आहे. 10 मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गांवर सरकारने टोलमाफीचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (PWD) या संदर्भातील निर्णय जारी करण्यात आला आहे. शासनाच्या निर्णयानुसार टोल नाक्यावर वारकरी, मानाच्या पालख्या आणि भाविकांना टोलमाफी मिळणार आहे. जड आणि  हलक्या वाहनांना या टोलमाफीचा फायदा होणार आहे.

(हेही वाचा – Israel Iran Conflict : ताबडतोब तेहरान सोडा; ट्रम्प यांची पोस्ट, जी ७ परिषद अर्धवट सोडून का निघाले ?)

दरवर्षी लाखो वारकरी आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) निमित्त पंढरपूरला जात असतात. विठ्ठल नामाचा जयघोष करत हे वारकरी दिंड्या घेऊन पंढरपूरला जातात. पंढरपूरला आषाढी एकादशीच्या दिवशी अभूतपूर्व असा सोहळा पाहायला मिळतो. वारकऱ्यांसाठी हा खास सोहळा असतो. वर्षभर वारकरी या क्षणाची वाट पाहात असतात.

(हेही वाचा – Israel Iran Conflict : इस्रायलला स्वसंरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार; G7 देशांनी केले समर्थन)

वारकऱ्यांना टोलमाफी देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. या संदर्भातील निर्णय जारी करण्यात आला आहे. 18 जून ते 10 जुलै दरम्यान वारकऱ्यांना ही टोलमाफी दिली जाणार आहे. 10 मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गांवर टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे वारकऱ्यांना आता या मार्गावर कुठलाही टोल भरावा लागणार नाहीये, वारकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.