Mumbai Rain : मुंबईत पावसाचे पाणी साचण्याच्या ठिकाणांमध्ये होतेय वाढ?

353
Mumbai Rain : मुंबईत पावसाचे पाणी साचण्याच्या ठिकाणांमध्ये होतेय वाढ?
  • सचिन धानजी, मुंबई 

मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबणाऱ्या ठिकाणांची संख्या कमी होण्याऐवजी आता वाढतच जात असून मागील वर्षी जिथे ६० ठिकाणे शिल्लक होती, तिथे आता ही संख्या ८६ वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण पूरप्रवण क्षेत्र जिथे ३८६ होती तिथे ही ठिकाणे आता ४५३ एवढी झाली आहे. (Mumbai Rain)

मुंबई मध्ये मागील वर्षी ३८६ पूरप्रवण क्षेत्रे आढळून आली होती. त्यापैकी ३२६ पूरप्रवण क्षेत्रांमधील पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात आली असून उर्वरित ६० पूरप्रवण क्षेत्रांचे मुंबई महानगरपालिका व इतर संस्थांनी निराकरण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा दावा प्रशासनाच्यावतीने करण्यात आला. परंतु यावर्षी महापालिकेने या एकूण पूरप्रवण क्षेत्रांची संख्या ४५३ एवढी झाली असल्याचे सप्ष्ट करून त्यापैंकी ३६९ पूरप्रवण क्षेत्र नियंत्रणात आणल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आजही मुंबईत ८६ अशी ठिकाणे आहेत की जिथे पावसाळ्यात पाणी तुंबले जाऊ शकते. (Mumbai Rain)

(हेही वाचा – समय रैनाच्या अडचणी पुन्हा वाढल्या; अपंगत्वावर केलेल्या टिप्पणीमुळे Supreme Court संतापले; म्हणाले…)

महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मुंबईत प्रत्येक पावसाळ्यात पाणी तुंबण्याची नवीन ठिकाणे तयार होतात आणि त्या ठिकाणाची प्रत्यक्ष तपासणी आणि पाहणी केल्यानंतर त्यावर तात्काळ किंवा दिर्घ उपाययोजना केल्या जातात. ज्यामध्ये कधी पर्जन्य जलवाहिनीचा अंतर्गत भागात गाळ किंवा अन्य काही साचून त्यातील प्रवाह खंडित होणे असे प्रकार घडतात. त्यामुळे अशाप्रकरणांमध्ये पर्जन्य जलवाहिनीतील पाण्याचा प्रवाह सुरुळीत करून ते ठिकाण पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यायोग्य केला जातो. मात्र, ३० अशी ठिकाणे आहेत ज्यांची झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण तसेच रेल्वे आदींकडून योग्यप्रकारची उपाययोजना केली जात नसल्याने त्यावर पूर्णपणे यश मिळवता येणार नाही. तसेच झोपडपट्टी भागांमध्येही अशी ठिकाणी निर्माण होतात. (Mumbai Rain)

पाणी तुंबण्याची ठिकाणे वाढत असली तरी प्रत्यक्षात पाण्याचा निचरा करण्याचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसून येत आहे. जिथे काही तास पावसाचे पाणी तुंबून राहायचे हे प्रमाण मिनिटांवर आले असून समुद्राच्या भरतीच्या वेळेत जरी हे पाणी तुंबले गेले तरी त्याचा निचरा जलदगतीने होत असल्याचे मागील काही वर्षांत दिसून येत आहे. मिलन सब वे मध्ये मागील दोन वर्षांमध्ये पाणी तुंबले नसल्याचेही दिसून येत आहे. (Mumbai Rain)

(हेही वाचा – BMC School : उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांना मोबाईल आणि टिव्हीपासून दूर ठेवण्यासाठी राबवणार ‘हा’ उपक्रम)

अशाप्रकारे आहे पाणी तुंबणारी आणि निचरा झालेली ठिकाणे : 
  • पाणी साचणारी एकूण ठिकाणे (सन २०२४ : ४५३) (सन २०२३ : ३८६)
  • पाण्याचा निचरा होणारी क्षेत्र (सन २०२४ : ३६९) (सन २०२३ : ३२६)
  • नियोजन स्तरावरील पूरप्रवण क्षेत्र (सन २०२४ : ११) (सन २०२३ : ०४)
  • शासकीय प्राधिकरण तथा खाजगी मालक यांच्या समन्वयाने हाताळावयाची पूरप्रवण क्षेत्र (सन २०२४ : १८) (सन २०२३ : ३६)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.