Air India Flights : तांत्रिक बिघाडामुळे एअर इंडिया(Air India Flights)चे अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द करण्यात आले. एअर इंडिया(Air India Flights)चे उड्डाण क्रमांक AI-159 हे दुपारी १ वाजून १० मिनिटांनी अहमदाबादहून लंडलना जाणार होते. दरम्यान, उड्डाणा(Air India Flights)च्या काही तास आधी ही तांत्रिक बिघाड आढळल्यानंतर एअर इंडियाचे आणखी एक AI-143 हे विमान उड्डाणदेखील रद्द करण्यात आले. उड्डाणाआधी झालेल्या तपासणीत काही तांत्रिक अडचणी आढळल्यानंतर त्रुटी सोडविण्याचा प्रयत्न सुरू केला. AI-143 हे विमान पॅरिसच्या चार्ल्स डी गॉल विमानतळावर रात्रीच्या उड्डाणावर निर्बंध असल्याने विमान उड्डाण रद्द करण्यात आले.(Air India Flights)
(हेही वाचा Ahmedabad Plane Crash : हवाई सुंदरी मैथिली पाटीलला शेवटचा निरोप; अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार )
मागील दोन दिवसांत चार बोईंग विमाने माघारी
१६ जून : सोमवार, १६ जूनला हाँगकाँगहून दिल्लीला येणारे एक विमान तर दिल्लीहून रांचीला जाणारे एअर इंडियाचे दोन विमान परतावे लागले.
पहिले उड्डाण : हाँगकाँगहून दिल्लीला येणारे एअर इंडियाचे विमान(क्रमांक AI315) तांत्रिक बिघाड झाल्याने परतले. सदर उड्डाण बोईंग 787-8 ड्रीमलायनरचे होते.
दुसरे उड्डाण : दिल्लीहून रांचीला जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान संशयास्पद तांत्रिक समस्येमुळे उड्डाणानंतर लगेचच दिल्लीला परत वळविण्यात आले. बोईंग ७३७ मॅक्स ८ विमान सायंकाळी ६:२० वाजता रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावर उतरणार होते.
१५ जून : रविवार, १५ जूनला भारतात येणारी दोन बोईंग ड्रीमलायनर विमाने मध्यातूनच परतली. यापैकी एक विमान लंडनहून चेन्नईला तर दुसरे जर्मनीतील फ्रँकफर्टहून हैदराबादला येत होती.
पहिले उड्डाण : चेन्नईला येणारे ब्रिटिश एअरवेजचे बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमान तांत्रिक बिघाडामुळे परतावे लागले.
दुसरे उड्डाण : लुफ्थांसा एअरलाइन्सच्या बोईंग ७८७-९ ड्रीमलाइनरला बॉम्बची धमकी मिळाली होती. त्यामुळे विमानाला उतरण्याची परवानगी मिळाली नसल्याने माघारी परतावे लागले.
रविवार, १५ जूनला लखनऊमधील चौधरी चरण सिंह विमानतळावर सौदी अरेबिया एअरलाइन्सच्या विमान SV-3112 च्या लँडिंग दरम्यान चाकातून ठिणग्या व धूर येऊ लागला. पायलटने तात्काळ एअर ट्रॅफिक कंट्रोलरला याची माहिती दिली. या वेळी विमानात यात्रेकरू बसले होते. पायलटने तातडीने परिस्थिती ओळखून विमान थांबवले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. विमानतळाच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून फोम आणि पाणी फवारले. सुमारे २० मिनिटांच्या प्रयत्नांनंतर परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली.
(हेही वाचा Boeing vs Airbus : पॅरिस एअरशोमध्ये एअरबसची चलती; बोईंग कंपनीसमोरची संकटं वाढली )
दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय(डीजीसीए)कडून सुरक्षितता व ऑपरेशन्सवर लक्ष देण्याच्या सूचना आहेत. महत्त्वाचे म्हणजे, अहमदाबाद येथे घडलेल्या विमान अपघातात २४२ पैकी २४१ प्रवाश्यांचा मृत्यू झाला होता. या विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाकडून अधिक खबरदारी घेण्यात येत आहे. याद्वारे तांत्रिक तपासात कुठलीही त्रुटी जाणवल्यास त्याचा परिणाम विमान उड्डाणाच्या वेळापत्रकावर होताना दिसून येत आहे.
Join Our WhatsApp Community