Gorai : गोराईकरांनी काढला मोर्चा; सहायक आयुक्त आणि आमदारांनी असे केले शंकांचे निरसन

गोराईकरांच्या मोर्चात नोटीस बजावलेले कमी, रहिवाशांचाच मोठी गर्दी

273
Gorai : गोराईकरांनी काढला मोर्चा; सहायक आयुक्त आणि आमदारांनी असे केले शंकांचे निरसन
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

गोराई (Gorai) गावातील बनावट मोजणी नकाशाच्या आधारे बांधकाम केलेल्या बांधकामांवर शासनाच्या निर्देशानुसार तोडक कारवाई सुरु असून यासंदर्भात होत असलेल्या कारवाईचा निषेध तथा विरोध करण्यासाठी गोराई गावातील नागरिकांनी महापालिकेच्या आर मध्य विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. परंतु या र्मोचामध्ये नोटीस दिलेल्यांपैंकी कुणी नव्हते, तर गावातील रहिवाशी मोठ्याप्रमाणात होते. परंतु प्रत्यक्षात येथील स्थानिक रहिवाशांच्या बांधकामांवर कोणत्याही प्रकारची कारवाई नसताना या रहिवाशांच्या वतीने मोर्चा काढण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान हा प्रश्न महापालिकेशी निगडीत नसून राज्य शासनाशी निगडीत असल्याने तसेच पावसाळ्यात याबाबतची कारवाई केली जाणार असल्याचे सहायक आयुक्तांनी स्पष्ट केले. तसेच सरकारी जमिनीवर घर असेल आणि १९६२ पूर्वीची कागदपत्रे असतील तर अशा भूमिपुत्रांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, परंतु कोणत्याही प्रकारे बोगस कागदपत्रांच्या आधारे बांधकाम केले असेल तर त्याचे आम्ही समर्थन करणार नाही अशा शब्दांतच स्थानिक आमदारांनी रहिवाशांची समजूत काढल्यानंतर त्यांच्या शंकाचे निरसन झाले आणि त्यांनी हा मोर्चा स्थगित केला. (Gorai)

(हेही वाचा – BMC : मुलुंडमध्ये ६७३१ प्रकल्प बाधितांसाठीच्या सदनिकांचे काम प्रगतीपथावर; आयुक्तांनी दिले ‘हे’ आदेश)

गोराई (Gorai) गावातील गोराई व्हिलेजर्स वेल्फेअर असोशिएशनच्या वतीने महापालिकेच्या आर मध्य विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. हद्द कायम मोजणीचे नकाशे बनावटरित्या तयार करून भूमी अभिलेख विभागाच्या मूळ अभिलेखात छेडछाड करण्याची प्रकरणे समोर आल्यानंतर तसेच याबाबत महापालिकेच्या आर मध्य विभागाच्या मार्फत कलम  ३५१ अंतर्गत नोटीसा बजाविण्यात आल्या. ही बांधकामे  पाडण्यासाठी करण्यासंबंधीची कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. त्यानुसार महानगरपालिकेने प्रथमतः अनिवासी अनधिकृत बांधकामावर कारवाई हाती घेतली आहे तसेच पावसाळयानंतर निवासी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येणार आहे.

त्यामुळे या बांधकामांच्या संरक्षणासाठी गोराई (Gorai) गावातील रहिवाशांनी मोर्चा काढला होता. यावेळी शिष्टमंडळातील सदस्यांचे महापालिका सहायक आयुक्त संध्या नांदेडकर तसेच स्थानिक आमदार संजय उपाध्याय यांनी शंका निरसन केले. यावेळी आमदार संजय उपाध्याय यांनी कोणत्याही परिस्थितीत बोगस कागदपत्रांच्या आधारे बांधकाम करणाऱ्यांचे आम्ही समर्थन करणार नाही, परंतु ज्याच्या नावे सिटीएस क्रमांक असतील आणि जुनी कागदपत्रे असतील तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बैठक आयोजित केली जाईल आणि ही कागदपत्रे सादर करण्याची संधी दिली जाईल. त्यामुळे ज्यांच्याकडे जुने पुरावे असतील त्यांनी यावे असेही उपाध्याय यांनी आवाहन केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.