मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Kolkata National Highway) बोलोरो आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा (Bhandara) शहराजवळील बेला या ठिकाणी 27 एप्रिलच्या रात्री 10.30 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. या भीषण अपघातात (Accident News) चौघांचा घटनास्थळीचं मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
(हेही वाचा – Accident News : मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू)
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाईही करण्यात आली आहे. शिलेंद्र बघेल, शैलेश गोकुळपुरे, विनोद बिनेवार, अशोक धैरवाल अशी मृतांची नावे असून चालक अविनाश नागतोडे हे या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत.
चौघांचा घटनास्थळीचं मृत्यू, चालक गंभीर जखमी
रायपूरकडून (Raipur) आलेले बोलेरो वाहन हे नागपूरच्या (Nagpur) दिशेने प्रवास करत होते. या बोलेरोमध्ये ५ जण प्रवास करीत होते. बेला गावाजवळ असलेल्या हॉटेल साई प्रसादमध्ये हे सर्व जेवण करण्यासाठी महामार्गावरून वळत असताना नागपूरकडून भरधाव आलेल्या ट्रकवर आदळले. यात चौघांचा मृत्यू झाला. चालक गंभीर जखमी आहे. घटनेनंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबली. घटनेची माहिती मिळतात भंडारा पोलीस आणि गडेगाव महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना तातडीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविलं. तर, अपघातग्रस्त वाहनांना महामार्गावरून हटवून वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. (Accident News)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community