पुणे (Pune) जिल्ह्यातील ५६ धर्मादाय रुग्णालयांपैकी (Charitable Hospitals) ३६ रुग्णालयांमध्ये निर्धन रुग्णांच्या उपचारांसाठी असलेला १५० कोटी रुपयांचा निधी वापराविना पडून आहे. धर्मादाय आयुक्त (Charity Commissioner) कार्यालयाकडून ५२ रुग्णालयांनी मार्चपर्यंत लेखापरीक्षण अहवाल सादर केला आहे. त्यातून ही गोष्ट समोर आली आहे. एकीकडे रुग्णांना धर्मादाय योजनेच्या अंतर्गत उपचार नाकारले जात असतांना दुसरीकडे कोट्यवधी रुपयांच्या निधीचा योग्य विनियोग का होत नाही ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
(हेही वाचा – 8th Pay Commission : 8व्या वेतन आयोगाबाबत केंद्र सरकार अॅक्शन मोडवर ! 35 पदांवर करणार नवीन नियुक्त्या)
आर्थिक वर्षाच्या अखेरीस, ज्या ५२ रुग्णालयांनी लेखापरीक्षण अहवाल सादर केला आहे, त्यापैकी एकूण ८ कोटी ३१ लाख रुपये आय.पी.एफ्. (रुग्ण निधी) खात्यातून दुर्बल गटातील रुग्ण आणि गरीब रुग्ण यांवर खर्च करण्यात आले आहेत. शहरात एकूण ५८ रुग्णालये धर्मादाय योजने अंतर्गत चालतात. आणखी ६ रुग्णालयांनी त्यांचे अहवाल अद्याप सादर केलेले नाहीत.
रुग्ण निधी (आय.पी.एफ्.) खात्यात कोट्यवधी रुपयांहून अधिक निधी आहे. धर्मादाय योजनेंतर्गत प्रत्येक धर्मादाय रुग्णालयामध्ये वर्षभरात भरती होणार्या एकूण रुग्णांच्या देयकाच्या रकमेच्या २ टक्के निधी गरजू रुग्णांसाठी राखीव ठेवला जातो. ही रक्कम केवळ गरीब आणि दुर्बल रुग्णांना वैद्यकीय उपचार देण्यासाठी वापरता येते.
पुणे धर्मादाय कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार या कायद्याद्वारे बहुतेक रुग्णालयांच्या खात्यात निधी वापरात नाही. जेव्हा एखादा रुग्ण आय.पी.एफ्. योजनेंतर्गत उपचार घेण्यासाठी रुग्णालयात येतो, तेव्हा त्यांची पात्रता पडताळली जाते आणि उपचार केले जातात; परंतु रुग्णांची संख्या अल्प असते आणि त्यामुळे निधी जमा रहातो, असे रुग्णालयांचे म्हणणे आहे. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) एका महिलेचा पैसे भरले नाही, या कारणाने उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर समोर आलेला हा अहवाल धक्कादायक आहे, असे म्हटले जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community