Vishalgad Encroachment : विशाळगडावरील ११३ अतिक्रमणे हटवली; न्यायप्रविष्ट ४५ अतिक्रमणे लवकरात लवकर हटवण्याची हिंदूंची मागणी

54

ऐतिहासिक विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी प्रशासनाने हाती घेतलेल्या मोहिमेची अखेर सांगता झाली आहे. गडावरील सर्व अनधिकृत बांधकामे आणि दुकाने पूर्णपणे हटवण्यात आली असून, विशाळगडाने मोकळा श्वास घेतला आहे, असा दावा प्रशासनाने केला आहे. जिल्हा प्रशासन, पुरातत्त्व विभाग, पोलिस, स्थानिकांच्या सहकार्यामुळे मोहीम यशस्वी झाली, असे प्रशासनाने म्हटले आहे. (Vishalgad Encroachment)

(हेही वाचा – Soumya Swaminathan :   ‘सद्यस्थितीस कोरोनाचा धोका वाढतो आहे ही बाब खरी, पण…’; ‘WHO’च्या माजी शास्त्रज्ञांचं महत्त्वाचं भाष्य )

छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) हिंदवी स्वराज्याचा एक महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या विशाळगडावर गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे वाढली होती. यामुळे गडाच्या मूळ स्वरूपाला बाधा येत होती, तसेच पुरातत्त्व वास्तूंचेही नुकसान होण्याची भीती निर्माण झाली होती. शिवप्रेमी आणि इतिहास संघटनांकडून प्रशासनाकडे सातत्याने यासंदर्भात तक्रारी येत होत्या. विशाळगडावरील अतिक्रमणाच्या संदर्भात हिंदु जनजागृती समिती (Hindu Janajagruti Samiti) आणि ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’च्या वतीने महाराष्ट्र मध्ये ठीक ठिकाणी आमदारांना निवेदने देण्यात आली. तसेच मुख्यमंत्री आणि संस्कृतीमंत्री यांनाही याविषयी बैठक घेण्याविषयी पत्र दिले. अनेक ठिकाणी आंदोलने आणि मूकनिदर्शनेही करण्यात आली. याची गंभीर दखल घेत, जिल्हा प्रशासनाने आणि पुरातत्त्व विभागाने समन्वयाने ही अतिक्रमणे हटवण्याचा निर्णय घेतला.

दोन टप्प्यांत राबवलेल्या या विशेष मोहिमेमुळे गडावरील 158 पैकी 113 अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली आहेत, तर उर्वरित 45 बांधकामे न्यायालयीन कक्षेत आहेत. सुरुवातीला काही प्रमाणात विरोध झाला असला तरी, प्रशासनाच्या ठाम भूमिकेमुळे आणि स्थानिकांच्या सहकार्यामुळे कोणतीही अनुचित घटना न घडता मोहीम यशस्वी झाली.

विशाळगडला पूर्वीचे वैभव परत मिळणार

प्रशासनाने यापुढेही गडावर पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची खबरदारी घेतली असून, गडाच्या संवर्धनासाठी आणि सुशोभीकरणासाठी लवकरच नवीन योजना हाती घेण्यात येणार आहेत. यामध्ये गडाची स्वच्छता मोहीम, ऐतिहासिक वास्तूंचे पुनरुज्जीवन, पायवाटा दुरुस्त करणे, सुरक्षा व्यवस्थेत वाढ करणे आणि माहिती फलक लावणे इत्यादींचा समावेश आहे.

न्यायालयात अडकलेली ४५ प्रकरणेही लवकर मार्गी लावावीत ! – सुनील घनवट यांची मागणी

अतिक्रमणे काढल्याबद्दल प्रशासनाचे अभिनंदन ! पण अद्यापही ४५ बांधकामे न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेली आहेत. ती विशाळगडावर अजूनही आहेत. वास्तविक न्यायालयात जाऊन वेळकाढूपणा केला जात आहे. यामुळे विशाळगड अतिक्रमणमुक्त करण्याच्या प्रक्रियेला खीळ घातली जात आहे. विशाळगड संपूर्णपणे अतिक्रमणमुक्त होण्यासाठी न्यायालयात गेलेली प्रकरणेही फास्ट ट्रॅकवर चालवावीत, अशी आमची मागणी आहे. विशाळगडावरील सर्वच्या सर्व अतिक्रमित बांधकामे जेव्हा हटवली जातील, तेव्हाच विशाळगड खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेईल, अशी भूमिका विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे संघटक सुनील घनवट (Sunil Ghanwat) यांनी व्यक्त केली आहे. (Vishalgad Encroachment)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.