लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी कोर्टाचा मान ठेवणार का? मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी उपस्थित केला सवाल

240
महाराष्ट्राच्या Chief Secretary Post साठी 'शर्यत रंगली'; भूषण गगराणी आघाडीवर, चहल-राजेश यांच्यात जोरदार स्पर्धा

Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आक्षेपार्ह टिप्पणी बद्दल सर्वोच्च न्यायालयाने कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना खडेबोल सुनावले आहेत. या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) सांगितले की, आम्ही कोणालाही स्वातंत्र्य सैनिकांविरुद्ध असे बोलण्याची परवानगी देऊ शकत नाही. तसेच राहुल गांधी यांनी भविष्यात असे कोणतेही विधान केले, तर आम्ही स्वतःहून दखल घेऊन कारवाई करणार असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर सवाल उपस्थित केला. (Devendra Fadnavis)

(हेही वाचा – Pahalgam Terror Attack : न्यू यॉर्क टाईम्सचा भारतद्वेष उघड; पहलगाम हल्ल्याला म्हटले गोळीबार)

या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी हे आता सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेवणार का? असा आमचा प्रश्न आहे. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचा मान ठेवायला सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना सांगितले आहे. त्यामुळे मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो, असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच पहलगाम हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी आयोजित सर्वपक्षीय बैठकीला शिवसेना उबाठाकडून कोणताही नेता उपस्थित नव्हता. या बाबतही देवेंद्र फडणवीस यांनी उबाठावर निशाणा साधला आहे. 

(हेही वाचा – राज्यात १२१ Ola Showroom होणार बंद; नेमकं काय कारण? वाचा)

देशाची जनता शिवसेना उबाठाला माफ करणार नाही
बांगलादेश संदर्भातील युद्धाच्या वेळी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांनी स्वर्गीय इंदिरा गांधी सरकारला समर्थन दिले होते. मात्र आता सर्व पक्षीय बैठकीला शिवसेना उबाठा गटकडून अनुपस्थितीवरुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उबाठा गटाला खडेबोल सुनावले आहेत. ज्या-ज्या वेळी युद्धाची वेळ असते, युद्ध सादृश्य परिस्थिती निर्माण होते, देशावर हल्ला होतो किंवा देशाचा एखादा विषय असतो, त्या-त्या वेळी या देशातील पक्षांनी कधीही पक्ष बघितला नाही. हीच आपली परंपरा राहिली आहे. बांगलादेश युद्धात देखील त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधी पूर्णतः समर्थन दिले होते. हीच या देशाची परंपरा राहिली आहे. मात्र अशावेळी देखील टीका करणे, उपहास करणे, मूर्खासारखे स्टेटमेंट देणे, हे शिवसेना उबाठाचे (Shiv Sena UBT) सुरू आहे. याला देशाची जनता कधीही माफ करणार नाही, असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.