नवी दिल्ली : भारताची ओळख ही विविधतेतील एकता हीच आहे, असे सांगत द्रमुकच्या कनिमोझी करुणानिधींनी (Kanimozhi Karunanidhi) भारताच्या अधिकृत भाषेविषयीच्या प्रश्नावर उत्तर दिले आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानचे कांगावे उघड पाडण्यासाठी आणि दहशतवाद विरोधी लढाईत भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर जास्तीत जास्त समर्थन मिळवून देण्यासाठी भारत सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याची योजना केली आहे. त्याच शिष्टमंडळाच्या वेळी, स्पेनमध्ये कनिमोझी यांना एका पत्रकाराकडून भारताच्या राष्ट्रभाषेविषयी प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी भारतातील विविधतेतील एकता अधोरेखित करत प्रश्न टोलवून लावला.
(हेही वाचा – Pakistani Spy : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या माजी मंत्र्यांच्या खाजगी सचिवाला बेड्या; ज्योती मल्होत्राशी संबंध ?)
कनिमोझी (Kanimozhi Karunanidhi) यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळ सध्या युरोपमधील स्पेनमध्ये आहे. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत कनिमोझी यांना भारताची राष्ट्रभाषा कुठली या अर्थाचा प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना कनिमोझी म्हणाल्या “ भारताची राष्ट्रभाषा ही विविधतेतील एकता हीच आहे. हाच संदेश घेऊन आमचे शिष्टमंडळ जगासमोर आले आहे. या घडीला हाच सर्वात महत्त्वाचा संदेश आहे.”
(हेही वाचा – BMC : आमची मुंबई पालिका कुठे नेऊन ठेवली?)
तामिळनाडूमधील सत्ताधारी द्रमुक पक्षाचे मुख्यमंत्री स्टॅलिन हे कनिमोझी यांचे बंधू आहेत. तामिळनाडू मधील द्रमुक सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात हिंदी भाषेवरुन मोठा वाद झाला होता. केंद्र सरकार आमच्यावर हिंदी लादत आहे असा आरोप तामिळनाडूमधील द्रमुक सरकारने केला होता. त्यामुळे पुन्हा एकदा भाषिक अस्मितेचा संघर्ष उफाळून आला होता. याच पार्श्वभूमीवर कनिमोझी (Kanimozhi Karunanidhi) यांचे विधान तामिळनाडूमधील द्रमुक सरकार ऐकणार का ? हा मुख्य प्रश्न आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community